March 16, 2009

यंत्र-मंत्र-तंत्र : विधी आणि कर्मकांड -२

यंत्र-मंत्र-तंत्र : विधी आणि कर्मकांड -


मंत्र युग (Inforamation Age)

मी राहतो त्या परिसरात दर वर्षी सार्वजनिक धार्मिक उत्सव होतात. दिवसभर बोंबल्यावर तार स्वरात तबकड्या व फीतीवर धनीमुद्रित केलेले गायत्री मंत्र, आणि हिंदी मराठी सिनेमातील गाणी भक्तिगीते भावगीते पुन्हा पुन्हा वाजत असतात. पाच-दहा भाविकानी पुस्तकात बघून म्हटलेल्या आरत्या मात्र सकाळी एकदा व संध्याकाळी एकदा ऐकू येतात.

या सर्वाचा उत्सव साजरा करणारया समष्टीला (त्यात मी पण असतो - वर्गणी भरून) काय आध्यात्मिक आणि आर्थिक लाभ होतो याची कल्पना नाही. (कारण मी अधिकारी व्यक्ती नाही.) पण ही सामग्री तयार करणारी, विकणारी वा भाड्याने देणारी मंडळी मात्र आपला नफा वसूल करतात.

गायत्री मंत्र असो कि सिनेमातील गाणे, "मार गोली भेजेमेँ" असो, कि तुका म्हणे "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती".
या आणि आशा प्रकारच्या शब्दाना मंत्राचे सामर्थ्य कसे येते? दुसऱ्या शब्दात सांगायचे तर या शब्दांची कळत - नकळत आपल्याला व जनमानसाला आणि व्यापार धंद्याला काय लागणी होते?

प्रसिध्दीच्या अनेक माध्यमातून नित्यनवीन माहितीचा आपल्यावर अहोरात्र (२४ x ७) भडिमार चालू असतो. आपल्याला कशाची गरज आहे या गोष्टी ते आर्जवून सांगत असतात. त्यात आपल्याला शारिरीक मानसिक आणि आध्यात्मिक श्रमातून मुक्ति देणारया सोयी -- यंत्र आणि मंत्र - यांच्या जाहिराती पण आल्या. आपल्याला मायावी वास्तवतेच्या (Virtual reality) दुनियेत घेऊन जाणारी करमणुकिची साधने पण आली.

ही सारी माहिती अल्पजीवी तर असतेच. पण कशालाच वैश्विक मूल्यच काय पण तत्कालीन सार्वत्रिक आणि सामाजिक मूल्य पण नसते. प्रगतिच्या नावाखाली त्यांच्या सुधारलेल्या आवृत्या मात्र काढल्या जातात. उदा. नव्या वेष्टनात साबणाची वडी / चोकलेट वगैरे. आणि अहर्निश जाहिरातबाजीने त्याना सतत पेटत ठेवले जाते.

या सर्व यंत्र-मंत्र-तंत्र उद्योग धंद्यात काही मूठभर लोकांचे आर्थिक - राजकीय सत्तेचे लागेबांधे मात्र गुंतलेले असतात. या जंजाळात कालची समीकरणे - सिध्दांत आज बाद होतात व नवी तयार होतात. त्यात वैज्ञानिक, आर्थिक, सामाजिक, राजकारण, अन्न, शिक्षण, औषधी... सारे काही आले.

मुकी गाईगुरें चरत असतात; पण तेवढाच वेळ रवंथ पण करतात. आम्ही काय पाहिले, काय ऐकले, काय वाचले याचा रवंथ करायला कुठे आहे सवड?

मग "गरज आणि हवस" याचा ताळमेळ - संतुलन रहात नाही. आणि मग जगण्याचे -- "श्रम, विश्राम, आरोग्य आणि शिकणे" या चार मूलभूत जैवीक कार्यांचे -- समीकरणच चुकत जाते. आणि मग येतें भौगोलिक (आर्थिक) शिख्नरांचें वितळणे -- आणि हिमालयाच्या हिमशिखरांचे वितळणे -- ध्रुवीय प्रदेशांत हिमनगांचे वितळणे. यात अधिक महत्वाचे काय?

आपण आपले म्हणतो ते "आयुष्य" आपले नसतेच मुळी. आपला असतो फक्त अंहकार. "आयुष्या"वर आपला काहीच हक्क चालत नाही. आणि देव दयाळू असले तरी "आयुष्याला" दया माया मुळीच नसते. आपण फक्त मर्यादीत काळापुरते त्याचे विश्वस्त असतो असे म्हणा वाटल्यास. आयुष्य - वाटल्यास सृष्टी म्हणा, वा निसर्ग म्हणा -- त्याच्या मार्गाने जात असते.

(पहा: शरीरधर्म )

~~~~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

No comments:

Post a Comment