December 29, 2009

वासुदेव : मुंबईत आपला परिसर


वासुदेव, गोंधळी, गोसावी इत्यादि संप्रदायांचे लोक आता उणे होत चालले आहेत.
वरील छायाचित्रातील वासुदेव राहत्या घरांच्या गल्ल्यातून मोकळ्या आवाजात गात चालला होता; ओव्या, भजने, भारुडे इ. दिवाळी नुकतीच आटोपलीय.

मी जेव्हा त्याला फोटोसाठी थांबवले तेव्हा त्याने विचारले, "वार्ताहर का?"
मी म्हटले, "नाही. एक भावीक." मी त्याला बिदागी दिली.
या पंथांच्या लोकाना "भिक्षेकरी" म्हणतात. त्यात अर्थातच लाजीरवणे काही नाही. पण ते सार्थ सुद्धा नाही. गौतम बुद्धाचा भिक्षा मागायचा वाडगा सुप्रसिध्द आहे. आजच्या वैश्यवृत्तीच्या युगात भिक्षा मागणे हीन समजले जाते. मी भिक्षा नाही म्हणत, "बिदागी" म्हणतो.

या साऱ्या इंडियाच्या आदिमप्रत (archetypes) परंपरांचा भाग आहेत. या समाजधारणेतून निर्माण झाल्या होत्या. बारा बलुतेदारांप्रमाणे लोक यानापण बिदागी अजूनही देतात.
११० - ११५ करोड़ लोकवास्तीत कितिकाना मोबाईल फ़ोन / टेलीविजन / आयपोड़ घेणे परवडते?
वासुदेव म्हणजे चालता बोलता ग्रामोफोन / रडियो / वाकिटाकी / रिअलिटी शो!

वासुदेवांची गाणी लोकासाहित्याचा एक भाग आहे.

परंपरेच्या नावाने चाललेल्या गोंधळात परंपरागत गोंधळी मात्र सामील होत नाहित. परंपरेच्या नावाने चाललेले राजकारण त्याना पक्के माहीत असते. असे राजकारण समाजधारणेला नव्हे तर समाज-विघटनाला मात्र हातभार लावते. मराठी सत्तेच्या काळात गोंधळी पोवाडे गाऊन लोकजागृतीचे काम करीत होते.

वासुदेवाच्या गाण्याचा एक नमुना:


दान पावलं ऽ दान पावलं ऽ
पंढरपुरामंदी इट्टोबारायाला
कोंढणपुरामंदी तुळजा ऽ बाईला
जेजुरीमंदी खंडोबारायाला
सासवडामंदी सोपानदेवाला


(वरील गाण्याचा संदर्भ: भारतीय संस्कृतिकोश, संपादक: पं. महादेवशास्त्री जोशी, पृ. ६३१-६३२)

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 23, 2009

आंबा मोहरला शरदात

आपला परिसर : आंबा मोहरला शरदात





या वर्षी शरादातच आंब्याला मोहर आला. त्यानंतर दोन तीन दिवस पाऊस पडला. वाटले मोहराची वाट लागली. पण तसे काही झाले नाही. हे छायाचित्र टिपताना आणिक मोहर आला आणि पिटुकल्या कैरया पण दिसू लागल्या.

मुंबईत सहसा आंब्याची झाडे दिसत नाहित. इथे बहुतेक शोभेची (?) झाडे वाढवतात. काही लहान-मोठ्या मुलाना विचारून पाहिले पण त्याना ते झाड कसे दिसते माहीत नव्हते. आंबे जरी आवडीने खात असले तरी कुतूहल नावाची चीजच नाही त्याला काय करणार?

यात काय आश्चर्य! मी एकदा परदेशी विज्ञ्यान सप्ताहिकात वाचले, इंग्लंड येथील लोकाचा समज होता कापूस प्राण्यापासून पैदा होतो, जशी लोकर मेंढ्यापासून मिळते.

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 16, 2009

वानसे जेथे वन्यजीवन तेथे वसे


एका कोळीयाने
गच्चीच्या कट्ट्यावर ठेवलेल्या कुंड्यांतली झाडे: कोरफड, ब्राम्ही, आवल्याचे रोप, तुळस, अबोली, गुलाब, इत्यादि. तेथे बांधिले एका कोळियाने जाळे. काही दिवसानी पाहिले तर ते नाहीसे झाले होते. कुणीतरी "साफसफाई" केली होती!

जेथे वानासांची जोपासना केली जाते तेथे सूर्यप्रकाश असतो -- असावा; पाण्याचा ओलावा असतो; विविध कीड़े, अळ्या, डांस, कीटक, माशा, मधमाशा, गांडुळे . आणि असंख्य जीवाणू (bacteria) असतात.

कोळ्याला उपजतच माहीत असते कुठे जाळे बांधावे. (घरातही कोळीष्टके असतात.) कधी कोळी भक्षक असतो, कधी तो भक्ष्य (विशेषत: रासायनिक कीट्कनाशकांचा बळी) होतो. निसर्ग - सृष्टी -- प्रकृति इच्या "पर्यावरण + पारिस्थितिकी + उर्जा" यांच्या संतुलनपूर्वक नियोजनाचा हा भाग असतो. पण माणसाराखा, विशेषत: इतिहासपश्च मानवासारखा (Post-historic man) अनिवार, अमर्याद भक्षक दुसऱ्या कोणत्याही योनीत (species) नसेल.

एकदा रस्त्याच्या बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मी भटकत होतो. पावसाळ्याचे दिवस होते. एके ठिकाणी डामरी रस्त्याच्या कडेला "NSS" या संस्थेचे स्वयंसेवक कामास लागले होते. काम काय? रस्त्याच्या कडेला मातीत नव्याने रुजलेली रोपती उपटून ते "साफसफाई" करीत होते.
नागरी संस्कृतीची सौंदर्याची कल्पना फारच विचित्र आहे, भोगवादी दृष्टीसुखाच्या लालसेने लडबडलेली, मग ते कोळ्याचे जाळे असो कि वर्षभर मातीत सूप्त असलेल्या बीजांतून उगवालेली रोपे असोत. ती वानसे वन्यजीवन एकमेकांचे पोषण - निर्वाह करीत असतात. पण लक्षात कोण घेतो!

वनस्पतींची उपज आणि जोपासना नियमित केल्याने शारीरिक व मानसिक स्वस्थ्याला मदत तर होतेच, पण नकळत ध्यानाला पण चालना मिळते. कारण साधे आहे, वानसे चर्पटपंजरी करत नाहीत. तरीही इथे संतत काहीतरी असते. एक अनोखा वास्तव चलतचित्रपट दिवसरात्र चालू असतो. इथे स्थूल स्तरावर (micro level) महान विश्व जमात (cosmic community) कार्यरत असते. येथे आपल्यातील व विश्वातील पंचमहाभूते दरेक भेटीत संपर्कात येतात.

वरील छायाचित्र अगदीच सामान्य आहे. तसेच वरचे लेखनही, सामान्य व रोखठोक. त्यात कोणत्याही प्रकारचे नाटय - अलंकार - काव्य नाही. आहे ते जीवनाचे नाटय - काव्य जे स्वत:च शोधायचे अन् अनुभावायचे. जे काही आपल्याला कळले वाटते ते आपल्या बोधन क्षमतेप्रमाणे (perception); ते वळतेच असे नाही.
शब्द - चित्र - ध्वनी असतात फक्त वास्तावतेचा आभास, केवळ मायावी वास्तवता.


~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 07, 2009

रेमीची मुक्ताफळे १४

रेमीची मुक्ताफळे १४


"निसर्गाचे मौन होते

जेव्हा
शीवाचे तांडव,

येते
सुनामीचा अवतार घेऊन."




(अधिक वाचा "मौनाचा ध्वनी : मौनाची सांगता")

-----------------------------------------------










टीप: चित्र-सदर्भ - "द ग्रेट वेव" चित्रकार कात्सुशिका होकुसाही (१७६०-१८४९) रंगित वुडकट


~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 05, 2009

मळलेल्या वाटा सुखाच्या

मळलेल्या वाटा सुखाच्या
कितिक कितिकांसाठी.
नव्या बोचाणारया, खुपणारया,
वादळ वाऱ्यात पुसल्या जातात;
डुबतात परस्पर विरोधी रंगांत.
कुणी शोधावे भग्नावशेष पुसल्या वाटांवर;
कुणी नवे दरवाजे आपलेसे करण्या.
असे कितिक काळाच्या उदरात
पुसल्या जाणारया वाटांचे भान नसलेले;
रंगी बेरंगी विश्व पाहून बेहोश झालेले.
अंत:काळ त्यांच्या पावलांच्या
खुणा फडक्याने विस्मरणाच्या
पुसत सरकत आहे पाठोपाठ:
ओढ़ आहे महाद्वाराची स्वातंत्र्याच्या
जिथल्या मार्गाना नाहीत
लांबी रुंदीच्या मर्यादा,
नाहीत अस्तित्वाची बंधने --
नाही अहंतेचा संघर्ष.
* * *

(वड़ोदरा | १९६९)

~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 01, 2009

रेमीची मुक्ताफळे १३



"
सर्जनशील (विधायक) निर्मितीच्या सामर्थ्याने

प्रस्थापित संकेतांचे अर्थ बदलतात - संकेत बदलतात.

"
अर्थातच विधायक निर्मितीत अण्वास्त्रे येत नाहीत.
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape