रेडियो ऐकल्यापासून नेहमी वाटले नभोवाणीवर - "ऑल इंडिया रेडियोवर" - विविधभारती प्रमाणे "लोकभारती" व "अभिजात-भारती" अशी २४ तास चालणारी आणखी दोन केंद्रे हवीत. (कारण अरुणाचल प्रदेशात पहाट मुंबईच्या पूर्वी होते.) साने गुरुजीनी सुरु केलेली "आंतर भारती" नेहेमी आठवायची; अजूनही आठवते.
नंतर आली "दूरचित्रवाणी".
एवढा "मेरा भारत महान', एवढी तिची परंपरा प्राचीन, एवढी तिची विविधता रम्य... नृत्य नाट्य चित्र शिल्प कथा काव्य! प्रत्येक प्रदेश, प्रत्येक मानव समूह संपन्न या विविध संकृति माध्यमातून!
पण राष्ट्रभाषा हिंदी, म्हणून तिला प्राधान्य; म्हणून बौलीवूडला प्राधान्य. नंतर आल्या राजभाषा; त्यांचीही केंद्रे आली. बरे झाले.
नभोवाणी आली - चित्रपट आला - दूरचित्रवाणी आली. पण लोककला अन् अभिजात कला या माध्यामावर मात्र दिवसेदिवस मागे पडत गेल्या.
पण लोककला व अभिजात कला कोपऱ्यात पडल्या. त्यांच्या नावाने चित्रपटातून विडंबने (की विटंबना?) मात्र ऐकायला / पहायला मिळते. म्हणे आम्ही देशभक्त.
परदेशात "वारसा संवर्धनाची" (heritage conservation) टूम निघाली की आम्ही तिची सरसावून नक्कल करतो. पण परदेशी क्लासिकल संगीताची २४ तास चालणारी केंद्रे आहेत हे फार थोड्याना माहीत असेल. शेवटी वारसा वस्तूंमध्ये नसतो: तो लोकांमध्ये असतो हे आम्ही विसरतो. लोकांचे संवर्धन करा मग वारशाचे संवर्धन आपोआप होईल.
* * *
रेमीजीयस डिसोजा~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
No comments:
Post a Comment