जीवन हे सर्वश्रेष्ठ आहे, सर्व स्थल-कालांत नागरी संस्कृतींनी निर्मिलेल्या सर्व कला, विज्ञाने, धर्म, तत्वज्ञाने, राज्यसंस्था इत्यादिहून सर्वतोपरी उच्चतम आहे.

March 01, 2010

पळस





















पळस
वैशाखाच्या मध्यान्ही
पळसाच्या
पाकळ्यांचा
उल्हास

उजळतो
राने डोंगर.

(ले. १६-३-८४)
टीप: वरील प्रतिमा Flowers of India या वेब साईटवरून घेतल्या आहेत.
पळसावर काळाचा वास असतो अशी श्रध्दा आहे. काळ म्हणजे मृत्यू, समय, प्रेम, काळ म्हणजे यम. "पळसाला पाने तीन" अशी म्हण आहे. होळीत या फुलांचा रंग पूर्वीच्या काळी वापरत असत. या रंगाच्या पाण्याने आंघोळ केल्याने चामडीचे रोग दूर होतात. हा मूळ भारतीय वृक्ष आहे. सुधारलेल्या आधुनिक पलास पलास सिंथेटिक रंग वापरतात. अन् जंगले नष्ट होताहेत. त्याबरोबरच वानासांची सामान्य माहितीपण नाहीशी होतेय.

काही वर्षांपूर्वी मुंबईत होळी उत्सवात माझ्या एका सहाकारयाची लहान पुतणी विषबाधेने वारली व तिच्या बरोबरीची आठ मुले अत्यवस्थ झाली होती. त्यांच्याच शेजारी तरुणाने कौतुकाने ते रंग मुलाना आणून दिले होते. आयत्या आलेल्या सुधारणेची पारख कोण, कशी, केव्हा करणार? या घटनेला तीस वर्षे झाली तरीही अशा घटना आजही सुवर्णनगरी मुंबईत घडतात.

पळस
~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

0 comments: