November 25, 2011

मी अण्णा हजारे नाही: डायरीचे पान

मी अण्णा हजारे नाही. लोकपाल विधेयक किंवा जन लोकपाल विधेयक, एकाचाही मसुदा मी वाचलेला नाही. आता पर्यंत या विषयावर झालेल्या गदारोळांत एवढी ऊर्जा वाया गेलेली आहे! पण वर्तमानपत्राचे एक पान या विधेयकांचा मसुदा प्रसिद्ध करण्यासाठी वापरले नाही; ना सरकारने ना चळवळ्यानी. असं कांही फुकटात वाचायला मिळाले असते तर त्यावर मी माझा अभिप्राय अवश्य लिहिला असता.

कोणतेही विधेयक पास होवो. हितसंबंधी लोक त्याचा बोर्‌या वाजवणार, ते हायजैक करणार. मग ते राजकारणी असतील, उद्योजक असतील, सरकारी कर्मचारी असतील किंवा सफेद कालरवाले गुंड असतील. जेथे कायदा करणारेच कायदा धाब्यावर बसवतात म्हणून आज तुरुंगांत बसवले आहेत, हे आपण पाहतोच. तेथे इतरांचे काय?

अण्णानं जर लोकसहभागाने गांवांना हरीत करण्याची मोहिम चालू ठेवली असती, आजुबाजूच्या चार गांवांत नेली असती तर वेगळा इतिहास घडला असता. हे 'हरित गांव' विधायक काम आहे, पण एवढे एक अण्णाच गांव पुरेसे नाही. त्यानं काय आकाशाला ठिगळ लावणार? नाही तरी आम्हाला एका पिसाने मोर व्हायला आवडते.
[२१:५९, शनिवार १७-०९-२०११]
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

No comments:

Post a Comment