tag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post3109463593803940346..comments2023-06-22T17:48:21.107+05:30Comments on रेमीची मराठी बोली : REMICHI MARATHI BOLI: अर्वाचीन महाभारत-कुरूक्षेत्र भारतभरAnonymoushttp://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comBlogger15125tag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-78569784183462294752012-10-07T10:45:12.972+05:302012-10-07T10:45:12.972+05:30वा. ल. कुलकर्णी यांचे 'साहित्य : स्वरूप आणि सम...वा. ल. कुलकर्णी यांचे 'साहित्य : स्वरूप आणि समिक्षा' (पहिली आवृत्ती १९७५) हे पुस्तक वाचनालयात अनायासे हाती आले. विद्यार्थ्याना हे अभ्यासाला आहे असे ऐकले.<br />'साहित्य आणि इतिहास' या प्रकरणात महाभारत येणे अर्थातच अपरिहार्य. 'वाल'नी या महाकाव्याचे सुरेख विवेचन केले आहे. त्यात त्यांनी पुढील प्रश्न उपस्थित केला, तोपण अटळ आहे : 'महाभारतकथेचे वास्तव ... एकाच वेळी विशिष्ट आणि सार्वकालीन सत्त्यांची सूचना देत आहे... हा त्याचा आवाका आहे तो वर्तमान साहित्यात कितपत गोचर होऊ शकतो हा खरा प्रश्न आहे (पृष्ठ १५१).'<br />त्यांनी शेवटी काढलेला निष्कर्षही तेवढाच वास्तव पण कटुसत्य आहे. 'परंतु... एका प्रचंड समाजमनाची निर्मिती आहे असा आभास निर्माण होण्याइतपत तिला सामर्थ्य लाभणे एकंदरीने कठीण (पृष्ठ १५३).'<br />मात्र मी काढलेल्या निष्कर्षापर्यंत किंवा पर्यायापर्यंत ते पोहोचले नाहीत. त्याचे कारण साधे आहे. आम्ही पाच हजार वर्षांच्या जोखडातून मुक्त होणे सहजासहजी शक्य नाही. लक्षावधी वर्षांपूर्वी जो माणूस होता तोच आजही आहे. त्यालाही सृष्टीने संस्कृतीचे वरदान दिले होते, ते आजही अव्याहत चालू आहे. पण कोणती नागरता किंवा सुसंस्कृत समाज – civilization – शाश्वत आहे? या प्रश्नाकडे 'वाल'नी काणाडोळा केला. शेवटी आमच्या विचाराला आपणच मर्यादा घालतो, एवढेच.<br />माझे विचार चक्र चालूच असते. कारण हा विषय मला अगत्याचा वाटतो.Anonymoushttps://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-66808617588261682662012-09-13T13:48:43.654+05:302012-09-13T13:48:43.654+05:30माझे नाव सागर आहे. मी www.mindurmarathi.com या संक...माझे नाव सागर आहे. मी www.mindurmarathi.com या संकेतस्थळाचा लेखक आहे. ही वेबसाईट मी २ महिन्यापूर्वी सुरु केली असून माझा प्रयत्न मराठी-इतर लोकांना अतिशय सोप्या पद्धतीने मराठी शिकविण्याचा आहे. माझी अशी इच्छा आहे कि आपण आपल्या sidebar मध्ये या वेबसाईटची लिंक टाकावी जेणेकरून गरजू व्यक्तीना मदत होईल.<br /><br />धन्यवाद. <br />Sagar Sonakhttps://www.blogger.com/profile/12614305727332026796noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-88347676533313462762012-09-12T12:33:38.917+05:302012-09-12T12:33:38.917+05:30आशाताई, स्वागत!
आपण म्हणता ते खरं आहे. सत्ताधारी -...आशाताई, स्वागत!<br />आपण म्हणता ते खरं आहे. सत्ताधारी - सत्ताभिलाषी, सारे एका माळेचे मणी. पण यांचे आजच्या परिस्थितीत बोलाविते धनी नजरेस येत नाहीत. उच्चभ्रू वर्गाचे लोक कोणत्या ना कोणत्या वादात गुंतलेले असतात. हे अल्पसंख्यांक - १० ते १५ टक्के उच्चभ्रू ८५ ते ९० टक्के रयतेवर राज्य करताहेत. नव्वद कोटी शेतकरी "वर्ग" संघटीत नाही, जसे ओद्योगिक कामगार संघटीत असतात. आतापर्यंत दहा वर्षांत विदर्भातील दहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. याला कोणीच एक्सपर्ट उत्तर देऊ शकत नाही. देशाच्या शिरगणती अनुसार, गेल्या वर्षापर्यंत शेतकरी बायकांचा दर्जा Non -workers असा होता. एक फिर्याद सुप्रीम कोर्टात गेली तेव्हा पर्यंत न्यायाधीशांसह कायदे पंडितांना हे माहीतच नव्हते. हे ब्रिटीश राजवटीपासून चालू होते. हे १९८० साली माझ्या ध्यानात आले. आणि ते काही स्वयंसेवी संस्थाना सागितले पण. पण लक्षात कोण घेतो? मी काही चळवळ्या activist नाही.<br />पूर्ती केल्याबद्दल आभार!<br />Anonymoushttps://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-59184335124050480232012-09-12T05:40:49.004+05:302012-09-12T05:40:49.004+05:30सत्ताधारी नियम करणार अन त्या करता इतरांना राबवणार ...सत्ताधारी नियम करणार अन त्या करता इतरांना राबवणार हा पूर्वापार चालत आलेला राबता आहे . जातीय समीकरणं ही त्यातलीच, राहुल तरी त्याहून वेगळा कुठे त्याला जी थोडी सत्ता मिळते ती तो वचपा काढायलाच वापरतो.Asha Joglekarhttps://www.blogger.com/profile/05351082141819705264noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-68660019563144370362012-09-08T12:36:52.773+05:302012-09-08T12:36:52.773+05:30खरं पाहता मी तरी कितीशा कॉमेंट्स करतो. केल्या तर त...खरं पाहता मी तरी कितीशा कॉमेंट्स करतो. केल्या तर त्या विस्तृत असतात. काही लोकांना हे अनपेक्षित असतं; असं बोलूनही दाखवतात. हि जागा खरं तर वाचकांची, आणि चर्चेची. पण काही लोक तर प्रशस्ती पत्रे देतात. पंचवीस वयापर्यंत आपण तेच जमा करत आलो, त्यामुळे आता इतरांना पण द्यायची!!<br /><br />आज म्हणे "जागतिक शिक्षण दिवस" -- आणखी एक घोषणा.<br />पण सुयोग्य (appropriate) शिक्षण कोण, कसे ठरवणार? हितसंबंधी "सत्ता" ते कधीही होवू देणार नाही. नाहीतर तीन हजार वर्षांनंतर ४० टक्के जनता अजूनही निरक्षर राहिली असती का? असा हा आमचा महान इतिहास!! काल-परवा पर्यंत देवाभाषेला पण अस्पृश्यांचा विटाळ होत होता. म्हणून ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद ऐकवले होते; त्याला सातशे वर्षे झाली.<br />आजची सत्ता भांडवलशाहीची -- त्याला साम्यवादी लाल चीन पण अपवाद नाही -- त्यांना सत्तेच्या गुलामागीरीचेच शिक्षण द्यायचे. कधीतरी ऐकण्यात आले होते, ब्रिटीश सत्तेला कारकून हवे म्हणून शिक्षण दिले.<br /><br />बिनधास्त टिप्पणीबद्दल मनापासून आभार!Anonymoushttps://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-73243979333205159282012-09-06T11:41:42.353+05:302012-09-06T11:41:42.353+05:30सत्तेचे अनेक अवतार ... हे नेहमीच अनुभवला येतात, घर...सत्तेचे अनेक अवतार ... हे नेहमीच अनुभवला येतात, घरी अन बाहेर. आपल्याकडे म्हण आहे : चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे. शाळेत मास्तर काही मुलांवर डूख ठेवतात. म्युनिसिपल ऑफिस, राशानिंग ऑफिस जल तिथे अरेरावी. हे साध्यासुध्या लोकांचे अनुभव तुम्ही लिहेले आहेत. खरंच बरं वाटलं !!<br />या लेखातील गर्भित अर्थ पण थोडा विचार केला तर ध्यानात येतात. धन्यवाद. हा लेख मासिकात किंवा पेपरात छापला असता तर बरे झाले असते असे मनापासून वाटले. ब्लॉग लिहिणारे कशाला वाचणार? आणि वाचले तर कुणाला असे स्वतंत्र विचार खपणार?flame o foresthttps://www.blogger.com/profile/18108935393279996115noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-39565391554470860112012-08-27T15:14:34.221+05:302012-08-27T15:14:34.221+05:30आपण म्हणता - चिंतनीय व करणीय - हे खरंच आहे, पण आपा...आपण म्हणता - चिंतनीय व करणीय - हे खरंच आहे, पण आपापल्या शैलीने व परीने करायाल हवे. आपण सर्वच जाणता-अजाणता वेगवान जीवनशैलीत अडकलो भरकटतो आहोत.<br />वरील रंगित चित्रे हमरस्त्यावरील आहेत. ती बापटांची आठवण करून देतात - एकच बोगदा मुंबई पुण्यात (दख्खनराणी).<br />भूमिहीन आणिक विस्थापित - काय असते ते मी अनुभवलेय सहा वर्षांचा असताना, आणि आता अट्टाहासाने या श्रेणीत राहातोय. एवढं एवढंच करणे शक्य होते.<br />या पोस्ट इतरांना पण इ-मेलने पाठवता येईल.<br />धन्यवाद!Anonymoushttps://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-58680176086003720912012-08-27T15:07:40.958+05:302012-08-27T15:07:40.958+05:30प्रथम : तुमची मनमोकळी टिप्पणी मला आवडली. आम्ही इति...प्रथम : तुमची मनमोकळी टिप्पणी मला आवडली. आम्ही इतिहासाचं शतकांचं ओझं डोक्यावर घेतो आणि भविष्याकडे डोळे लावून चालतो. या उचापतीत वर्तमानाकडे आपलं ध्यान राहातंच असं नाही. दुसरी गोष्ट अशी, कार्य-कारण-परिणाम cause and effect अटळ आहेत; भूत, भविष्य की वर्तमान असो. इतिहास त्याच्या अवशिष्टाच्या रूपाने waste आपल्यासमोर सतत उभा असतो. पण आपण त्याच्याकडे डोळेझाक करतो. हेच तर दाखवण्याचा प्रयत्न मी येथे केला आहे. आनंद हेच केवळ सुखाचे निदान व साधन असू शकते. इलेक्ट्रोनि साधनांच्या कुबड्या सर्वकाळ कशा कमाल येतील? <br />आभारी रेमीAnonymoushttps://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-37945401606797255122012-08-26T16:14:31.847+05:302012-08-26T16:14:31.847+05:30सेम एज् संवेद वाचले पुन्हा, नक्कीच जाणवलं महाभारता...सेम एज् संवेद वाचले पुन्हा, नक्कीच जाणवलं महाभारताची समीक्षा आहे; विरोधापलीकडे बरेच काही करण्यासारखे इथले मुद्दे आहेत. सध्या आपण सर्व औद्यीगीकी बाय-प्रोडक्ट्सनी होरपळून निघतोय, भूमिहीन (शब्द योग्य वापरतोय ना) त्यात कुठेच उभे राहू शकत नाही..खरंच चिंतनीय वर आणखी काही करणीय आहे हे सर्व. Anonymoushttps://www.blogger.com/profile/03845515339487799695noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-5985363884236958012012-08-26T11:53:52.464+05:302012-08-26T11:53:52.464+05:30सर, मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे. त्यामुळे इतिहासा...सर, मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास पहिली ते दहावी यत्तेपर्यंत झाला तेवढाच ! आपण लिहिलेले, इतिहास = नाव सोनुबाई आणि कथलाचा वाळा, वाचून धक्काच बसला. प्रयोगशाळेत आम्ही झाडे-पाने-फुले-जनावरे यांचे डिसेक्शन करतो. पण इतिहासाचे हे डिसेक्शन खरोखरच मला समजले नाही. कृपा करून खुलासा करा. मी ब्लॉग लिहित नाही. पण माझ्या विषयाचे ब्लॉग subscribe करायला वापरतो. आपला फोटोग्राफी ब्लॉग यामुळेच मी subscribe केला. आभारी.<br />ALLOPATRYhttps://www.blogger.com/profile/08588674488698215077noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-72600206526646480602012-08-21T10:55:24.855+05:302012-08-21T10:55:24.855+05:30सवितादी, आपला प्रतिसाद पाहूनच माझं काळीज सुपाएवढं ...सवितादी, आपला प्रतिसाद पाहूनच माझं काळीज सुपाएवढं झालं.<br />थोडक्यात खो असा : सामवेद यांनी ही 'खो'ची कल्पना 'नाव सोनूबाई आणि कथिलाचा वाळा' या म्हणीवरून सुरू केली. ती अशी : 'नावाजलेली' पुस्तके जी वाचल्यावर लक्षात येते कि आहेत 'कथिलाचा वाळा' ! अशा कोणत्याही पुस्तकाची समिक्षा करायची. हर्षदा विनय हिने हिंदी "पुस्तकाचे ऑपरेशन" केले आहे ते वाचनीय आहे!<br />आपण कोणतेही पुस्तक घेऊ शकता. आपणास पुस्तक परीक्षण नवीन नाही. मी घेतलेला विषय एक अलिखित पुस्तक - कथा - कादंबरी - महाकाव्य म्हणा वाटल्यास.<br /><br />माझ्या पूर्वीच्या कॉमेंट्स मी काढून टाकल्या आहेत. त्या आपल्याला मिळाल्या असलील. उगाच आत्मचरित्राने जागा का अडवायची?Anonymoushttps://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-69647321194686599622012-08-20T13:51:00.081+05:302012-08-20T13:51:00.081+05:30ता.क. जे कायमस्वरूपी लोकजीवनावर परिणाम करतील असे ...ता.क. जे कायमस्वरूपी लोकजीवनावर परिणाम करतील असे व्यास, तुकाराम, कबीर इत्यादी विरळाच?<br />मी, माझा अहंकार सदा गोंजारत बसणारा, कोण्या झाडाचा पाला?Anonymoushttps://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-28775136232541232492012-08-19T18:41:46.735+05:302012-08-19T18:41:46.735+05:30हं... मूळ कल्पना काय आहे 'खो'ची हे पाहिलेल...हं... मूळ कल्पना काय आहे 'खो'ची हे पाहिलेलं नाही अद्याप. पण सध्याच्या महाभारताची तुम्ही केलेली समीक्षा नेहमीप्रमाणे विचारांत पाडणारी आहे. <br /><br />मला या विषयावर लिहायला कितपत जमेल माहिती नाही!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-50842858463683566682012-08-16T13:04:10.438+05:302012-08-16T13:04:10.438+05:30@Samved The criticism of Contemporary Kurukshetra ...@Samved The criticism of Contemporary Kurukshetra is within the two songs. Could it make sense without the rest of text and images, which are a commentary on the two songs?<br />I am aware there many blank spaces. Also, I am caught in a balancing act between number of words and their meanings, as usual. <br />Anonymoushttps://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-60238390851384980462012-08-15T22:11:19.557+05:302012-08-15T22:11:19.557+05:30Thanks for taking it up! Read post couple of times...Thanks for taking it up! Read post couple of times, bond between pieces is bit vague so took time to get conceptSamvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.com