बांबूला काटा आला! बांबूला मुंबईत फुले आली!!
![]() |
| माझा पत्ता : मुक्काम - मुंबई, पोस्ट - इंडिया । विस्थापितांची मुंबई - १ |
![]() |
| निवारा बांबूचा - विस्थापितांची मुंबई - २ |
![]() |
| निवारा बांबूचा - विस्थापितांची मुंबई - ३ |
बांबूला काटा आला (फुलं आली असं म्हणणं क्रौर्य आहे की अभद्र?) म्हणजे बांबूचे मरण आले. आयुष्याच्या अखेरीला आपल्या बीजांचे भरघोस पीक देऊन तो देहदान करतो. असे हे हरकामी विलक्षण वानस आहे. सारीच गवते अशी असतात. किंबहुना सर्व वानसे अशीच असतात. आपले सर्वस्व 'पर्यावरण, पारिस्थितिकी व उर्जा' यांसाठी स्वाहा करतात. पण यापरी हा, एकमेवाद्वितीय!
फक्त नागरी बुद्धिमंत मानव आणि त्यांचे कर्तुत मात्र याला अपवाद असतील.
![]() |
| बांबूचे खुंट-भांडवलशाहीचे भोगवादी सौंदर्यशास्त्र |
बांबूच्या बीया उंदरांना मेजवानी असते! आणि उपासमारीनं पिडलेल्या माणसांना अन्नाचा घास!!
बांबूचे बीज तांदळाच्या दाण्याएवढे असते. जमीनीत पडलेल्या बीजातून / बेटात बांबू पुन्हा रुजतो आणि वाढतो. त्याच्या जातीचे इतर बांबू कोठेही असले तरी त्याना एकाच वेळी काटा येतो.
खरंच, कोणत्याही जातीच्या वेळूचे वय कोणाला सांगता येईल? कदाचित एकाद्या शेतकरी आजी-आजोबाना कुंपणातल्या बांबूचे वय आठवत असेल. किंवा आदिवासींना माहित असेल, कारण त्याना पिढ्यानपिढ्या परंपरेने ज्ञानाचा वारसा मिळतो!
॥ मुंबईत बांबूची फुले ॥
या महानगराच्या महामार्गांवर मी पायी भटकताना नजरेस पडतात कैक बांबूची फुले.
![]() |
| विस्थापितांची मुंबई - ४ |
अनेक उड्डान-पुलांखाली, फूटपाथवर, गटार-नाले-रेल्वेलायनी-महामार्ग यांच्या शेजारी... उघड्यावर आणि झोपडपट्ट्यांत (सरकारी परिभाषेत : गलिच्छ वस्ती).
येथे साठ लक्ष बांबूची फुले रोज फुलतात, रोज निर्माल्य होतात व पुन्हा नव्याने फुलतात.
हे आहेत भारताच्या औद्योगिक यंत्र-तंत्र-मंत्र या "विकासाच्या आधुनिक साधनाने" विस्थापित केलेले लोक.
येथे साठ लक्ष बांबूची फुले रोज फुलतात, रोज निर्माल्य होतात व पुन्हा नव्याने फुलतात.
हे आहेत भारताच्या औद्योगिक यंत्र-तंत्र-मंत्र या "विकासाच्या आधुनिक साधनाने" विस्थापित केलेले लोक.
गेली पाच हजार वर्षें या जनतेने राजे-रजवाडे, संस्थानिक, सम्राट, बादशहा यांची तळी उचलून धरली. त्यांच्या आपापसांतिल वैमनस्यांत हे मृत्युमुखी पडले.
त्यांच्या अहंकाराची स्मारके उभारण्यासाठी अनेक खर्व-निखर्व मोलाचे रक्ताच्या घामाचे पाट वाहिले.
![]() |
| विनामूल्य विश्राम - विस्थापितांची मुंबई - ५ |
लोकशाहीच्या नावाने आजही तेच शोषण चालले आहे. कायद्याने ते वाजवी असेलही. पण कुठे आहे न्याय?
आता जो विकास घडवला जातोय त्याचा लाभ कोणाला व कसा होतोय? आता लोकांना विकासातील विषमता नजरेस येत आहे. काही व्यक्ती व संस्थांच्या सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेमुळे भ्रष्टाचाराची कुलंगडी उघडी होताहेत. पण अजून किती वर्षांची, दशकांची, शतकांची वाटचाल पुढे आहे? याचे निदान करणारा कोणीही तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, प्रेषित आज अस्तित्वात नाही.
साकल्याने पाहता, या वस्तुस्थितीमुळे केवळ घृणा येते, शिसारी येते, किळस येते.
आता जो विकास घडवला जातोय त्याचा लाभ कोणाला व कसा होतोय? आता लोकांना विकासातील विषमता नजरेस येत आहे. काही व्यक्ती व संस्थांच्या सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेमुळे भ्रष्टाचाराची कुलंगडी उघडी होताहेत. पण अजून किती वर्षांची, दशकांची, शतकांची वाटचाल पुढे आहे? याचे निदान करणारा कोणीही तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, प्रेषित आज अस्तित्वात नाही.
साकल्याने पाहता, या वस्तुस्थितीमुळे केवळ घृणा येते, शिसारी येते, किळस येते.
![]() |
| विस्थापितांना मुंबईत रोजच अवर्षण - १ |
![]() |
| विस्थापितांना मुंबईत रोजच अवर्षण - २ |
![]() |
| अध्ययनाचे अध्ययन - सृष्टीची देणगी । विस्थापितांची मुंबई - ६ |
विकासाचे नियोजन व अंमलबजावणी यांचे "साधन आणि साध्य" कोणत्याही लोकाभिमुख राज्यात केवळ "जनता" हेच असले पाहिजेत, भांडवलशाहीचे यंत्र – मंत्र – तंत्र नव्हेत.
हे जेव्हा साध्य होईल तेव्हाच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक विकासाचे संतुलन साध्य होईल. दुसरा कोणताही नियम - सिद्धांत - प्रमेय - पर्याय युक्त नाही.
रेमीजीयस डिसोजा
मुंबई । २१.०२.१२
टीप: वरील सर्व छायाचित्रे रेमी डिसोजा याने काढलेली आहेत.
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.










