वासुदेव, गोंधळी, गोसावी इत्यादि संप्रदायांचे लोक आता उणे होत चालले आहेत.
वरील छायाचित्रातील वासुदेव राहत्या घरांच्या गल्ल्यातून मोकळ्या आवाजात गात चालला होता; ओव्या, भजने, भारुडे इ. दिवाळी नुकतीच आटोपलीय.
मी जेव्हा त्याला फोटोसाठी थांबवले तेव्हा त्याने विचारले, "वार्ताहर का?"
मी म्हटले, "नाही. एक भावीक." मी त्याला बिदागी दिली.
या पंथांच्या लोकाना "भिक्षेकरी" म्हणतात. त्यात अर्थातच लाजीरवणे काही नाही. पण ते सार्थ सुद्धा नाही. गौतम बुद्धाचा भिक्षा मागायचा वाडगा सुप्रसिध्द आहे. आजच्या वैश्यवृत्तीच्या युगात भिक्षा मागणे हीन समजले जाते. मी भिक्षा नाही म्हणत, "बिदागी" म्हणतो.
या साऱ्या इंडियाच्या आदिमप्रत (archetypes) परंपरांचा भाग आहेत. या समाजधारणेतून निर्माण झाल्या होत्या. बारा बलुतेदारांप्रमाणे लोक यानापण बिदागी अजूनही देतात.
११० - ११५ करोड़ लोकवास्तीत कितिकाना मोबाईल फ़ोन / टेलीविजन / आयपोड़ घेणे परवडते?वासुदेव म्हणजे चालता बोलता ग्रामोफोन / रडियो / वाकिटाकी / रिअलिटी शो!
वासुदेवांची गाणी लोकासाहित्याचा एक भाग आहे.
परंपरेच्या नावाने चाललेल्या गोंधळात परंपरागत गोंधळी मात्र सामील होत नाहित. परंपरेच्या नावाने चाललेले राजकारण त्याना पक्के माहीत असते. असे राजकारण समाजधारणेला नव्हे तर समाज-विघटनाला मात्र हातभार लावते. मराठी सत्तेच्या काळात गोंधळी पोवाडे गाऊन लोकजागृतीचे काम करीत होते.
वासुदेवाच्या गाण्याचा एक नमुना:
दान पावलं ऽ दान पावलं ऽ
पंढरपुरामंदी इट्टोबारायाला
कोंढणपुरामंदी तुळजा ऽ बाईला
जेजुरीमंदी खंडोबारायाला
सासवडामंदी सोपानदेवाला
(वरील गाण्याचा संदर्भ: भारतीय संस्कृतिकोश, संपादक: पं. महादेवशास्त्री जोशी, पृ. ६३१-६३२)
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.