Showing posts with label नागर-संस्कृती (civilization). Show all posts
Showing posts with label नागर-संस्कृती (civilization). Show all posts

September 19, 2013

अहंकार उर्मट आधुनिक संस्कृतीचा

धरतरीवर उल्का कुंड

अहंकार उर्मट उच्च तंत्रज्ञाचा,
झडपा लेवून, हिमालयाएवढ्या उंचीचा,
निर्मीतो उपग्रह, कॉम्पूटर ते महानगर,
खोदितो कायमची भगदाडे खोलवर,
उल्कांहूनी, धरतरीच्या उरावर :
महायुद्धे अगणित नादाविना भेसूर.
---
रेमीजीयस डिसोजा । मुंबई
(मूळ इंग्रजी कवितेचे भाषांतर)
०६:३१, २८-१२-२०११
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

October 01, 2012

सृष्टीत आम्ही सातत्याने

 सृष्टी स्तवन



भारताला संपन्न जैवविविधतेची देणगी सृष्टीकडून मिळाली आहे. त्यातूनही भारतीयांनी नारळाच्या झाडाला 'कल्पवृक्ष' असे संबोधले. नारळाला 'श्रीफळ' म्हटले. सृष्टी सर्व जीव मात्राला जगण्याचे साधन देते, आणि मानवाला संस्कृती देते. संगीत, काव्य, नाट्य, साहित्य, चित्र, वास्तू, महाकाव्ये ही केवळ संस्कृतीची अभिव्यक्ती आहेत. संस्कृती केवळ मानवात वसते.

सृष्टीत आम्ही सातत्याने


सृष्टी मानवप्राण्याला तिची लाडकी जीवजाती म्हणून ओळखत नाही, की नाही नागरी समाजाच्या कुंपणाना व त्यांच्या सामाजिक अधिश्रेणींना.



वानसे सुसंस्कृत समाजाची कुंपणे व अधिश्रेणी ओळखत नाहीत 
नागरी समाजांना कुंपणे - भिंती बांधायचे, वर्गवारी करायचे फारच वेड आहे. ते एवढ्यावरच थांबत नाही. त्या भिंतीवर नक्षीकाम करायचे, त्याच्यावर अलंकार चढवायचे, त्यांची स्मारके घडवायची, आणि टाळ्या वाजवायच्या हे पण पर्यायाने आलेच. उदाहरण: चीनची भिंत: ते तर सरंजामदारशाहीचे प्रतिक आहे.

तसेच वानसे आणि अन्य प्राणीजातीपण त्यांची सामाजिक बंधने व अधिश्रेणी ओळखत नाहीत.
पाळीव पशुपक्षीपण सायंकाळी निवार्‌याला घरी परतून येतात. त्यांना तेवढ्यापुरतीच कुंपणाची म्हणजेच मालकीची ओळख असते. सामाजिक अधिश्रेणी सोपान ते ओळखत नाहीत.
लहानपणी आईच्या दुधाव्यतिरिक्त इतर अन्न आपणास सुरू केले की जीवाणूंच्या झुंडी आपल्या उदरात कायम घर करून राहायला सुरवात करतात. त्यांच्या अनेक जातींची संकुले उदरात असतात!

आशा करूया, 'हिरवाई' बगिचे, झाडी, शेते, उरली सुरली जंगले, आणि नद्या-सरोवर-सागर यांच्यापल्याड; वर्डस्वर्थ याच्या कविता, टर्नरची चित्रे, यांच्यापल्याड; आणि फोटो सिनेमा विडयो - ही कितिही अद्यावत असली तरी - त्यापल्याड जावून आपण कधीतरी सृष्टीचा अनुभव घेऊ ! कारण ही सर्व माध्यमे मनोरंजक व दृष्टीसुख देणारी असली तरी ते सृष्टीला पर्याय नव्हेत.

वरील दाखले आपणांस निसर्गाच्या मनोहर / भयावह अनुभवांची आठवण करायला मदत करतील.
जीवशास्त्र आणि पुरातत्त्वशास्त्र, त्यांनी केलेली प्रगती आम्हाला निसर्गाची अधिकाधिक माहिती देते, शिवाय निसर्गातील आपले स्थान काय हेपण समजायला मदत करतात.
कदाचित चक्रीवादळे, मेघस्फोट, ज्वालामुखी, धरणीकंप, हिमवादळे, सुनामी... इत्यादि आणि आता वायुमान बदल (ही काही कल्पित कथा नव्हे) या रौद्रभयानक रूपांत निसर्गाचे सामर्थ्य आपणास दिसते. 

सृष्टीचे प्राथमिक निरिक्षण 


सृष्टीशी मौलिक संबंध प्राथमिक आणि वैयक्तिक स्तरावर प्रस्थापित करणे हे सर्वात उत्तम. स्वतःच्या शरीर व मनाचे निरिक्षण करणे; त्यासाठी नाही मुहूर्त, नाही मंत्र-तंत्र विधी, ना शुभाशुभ स्थानाचे, विषेश बैठकीचे अथवा वेशभूषेचे नियम. केवळ निरिक्षण, लक्षपूर्वक व करुणापूर्वक. कारण शरीर आणि मन आम्हाला या जगात टिकून राहाण्याची मिळालेली साधने आहेत व आम्ही त्यांचे विश्वस्त आहोत, मालक नव्हे. यात कोणतेही गूढ नाही; जशी बाहेरची हिरवाई तसेच आम्हीही सष्टीचेच केवळ भाग आहोत.

सृष्टीच्या निरिक्षणाचे दुसरे साधन  


उष्ण कटिबंधात वानसे  कोठेही उगवतात


आम्ही भारतीय पंच महाभूते पृथ्वी, आप, तेज, वायू आणि पैस परंपरेने मानतो.
स्वतःनंतर सष्टीच्या निरिक्षणाचा दुसरा उत्तम पर्याय असा : वानसांबरोबर संबंध जोडणे व त्यांचे निरिक्षण करणे. त्याहूनही चांगले प्रत्यक्ष कृती: सैपाकघरातून काही बीजे घेऊन मातीत पेरणे. त्यासाठी टीनाची प्लस्टीकची अथवा मातीची लहान कुंडी चालेल. मातीची कुंडी बरी कारण माती श्वासोश्वास करते. अशी पेरणी प्रत्येक ऋतूत केलेली बरी. आणि रुजलेल्या रोपांच्या वाढीस सूर्यप्रकाश व पाणी देऊन मदत करणे. मार्गदर्शक पुस्तके शक्यतो टाळावी. काही चूका झाल्या तरी हरकत नाही.
प्रत्येक बीज रुजेलच असं नाही. त्यांना येणारे कोंब पहावे, सूर्यप्रकाश व पाणी घालावे. हे सर्व करीत असताना रोपांबरोबर आपणही पंच महाभूतांच्या संपर्कात येतो, पर्यायाने सृष्टीच्या संपर्कात जाणीवपूर्वक येतो.

निसर्गाच्या प्रयोगशाळेत कृषीक्रांती

दहा हजार वर्षांपूर्वी अर्धनग्न मानवांनी रानटी वानसे आणि पशूपक्षांचे गृहसंवर्धन केले. आणि बिकट नैसर्गिक वातावरणात कृषीक्रांतीची सुरवात झाली. आणि ती सर्व जगभर पसरली (विना बौद्धिक मालकी हक्क).
त्या काळी नागरी संस्कृती किंवा सुसंस्कृत समाज किंवा civilization अस्तित्वात आले नव्हते. कृषिक्रांतीनंतर पाच हजार वर्षांनी सुसंस्कृत समाज Civilization म्हणजेच Urban Revolution, 'नागरी क्राती'चा उदय झाला.
औद्येगिक क्रांती Industrial Civilization काही शतकांपूर्वीच विलायतेत उदयास आणि पाहता पाहता सर्व जगभर पसरली. पण ती कधीच 'वैश्विक' universal झाली नाही. आपण उच्चभ्रू वर्ग मात्र येथे पोहोचलो. आपले अध्ययन सांघिक शिक्षण पद्धतिच्या जुळवणी पंक्तीवर Assembly Line झाले.
अजूनही वेळ नाही का आली सृष्टीशी संयोग करायची?

टीप : वरील मजकूर लिहित असताना एका इंग्रजी ब्लॉग वरील लेख Humans and Nature: Can the Gulf Be Bridged?  वाचनात आला. याचा मथळा वाचताच विलायती समाज आणि त्यांचे अनुकरण करणारे इतर समाज निसर्गापासून कसे दुरावलेले आहेत हे.ध्यानात येते. या लेखावरील माझी टिप्पणी प्रतिक्रिया अवश्य वाचावी.

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

October 27, 2011

॥ जेथे जातो तेथे ती माझी सांगाती ॥

॥ जेथे जातो तेथे ती माझी सांगाती ॥

रेखाचित्र, शब्दचित्र, शिल्पचित्र, छायाचित्र, चलत्‌चित्र... वा कल्पनाचित्र सारें कांहीं सृष्टीतून आलें; आणि व्यापार-उद्योगांत विरून गेलें.
 
की त्यांचे लक्ष्मी (तिजोरी) -पूजा व दुर्गा (युद्धें-अतिरेक-आतंक-सत्ता...) -पूजा यांत सार्वजनिक परिवर्तन झालें?
 
या धबडग्यांत सरस्वती-पूजा कुण्या वाळवंटात लुप्त झाली माहित नाही. मग सार्वजनिक शारदोत्सव कुठून ?

अनादि काळापासून जळ-जमिन-जीव यांनी - मूलतः सर्वच ज्ञात व अज्ञात सृष्टीने मानवाला संस्कृती प्रदान केली; त्यांचे भरण पोषण संवर्धन केले अशी माझी श्रद्धा !

त्या काळांत नागरी समाज अस्तित्वात नव्हते; ते निर्माण केले त्यांच्या स्वयंकेंद्रित सत्तेच्या आकांक्षेने !
 
हा अलिखित इतिहास आजही वर्तमान परिस्थितीत गम्य आहे. नागरतेच्या तथाकथित प्रगतीत, विषेशतः आजच्या औद्योगिक समाजाच्या मनात सृष्टीमातेचे काय स्थान आहे सांगायला नकोच. ते त्याच्या कृतीने सिद्ध होते.
अर्थात सृष्टीला त्याचे ना सोयर ना सुतक ! ती त्याचे वरदान व दंड - स्वर्ग व नरक - येथेच देते.
 

अधिक वाचा >> Civilization Trap In Our Era

दिवाळीचा पाडवा भातशेती झाली की येतो. शालिवाहन शक आणि अनेक पौर्वात्य शक वसंताच्या आगमनाने सुरु होतात. या व अशा अनेक परंपरा सृष्टीशी निगडीत आहेत. या सर्व संस्कृतीच्या अभिव्यक्ती ! मानवी संस्कृती सृष्टीतून उगम पावते व तिच्यात लोप होते. आता या परिस्थितीत माणसाच्या कर्तुताने फरक होत चालला आहे... व त्याचे परिणाम रोज पाहायला मिळतात.

मुंबई | दीपावली २०११
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

May 09, 2011

झुंडीत हरवले व्यक्तिस्व

संतोष कुमारमुंबईत एका फुलांच्या दुकानात काम करणारा शिक्षित नोकर,
फावल्या वेळात  कलाकुसर करतोहा त्याचा स्वायत्त अधिकार आहे.

झुंडीत हरवले व्यक्तिस्व

संवयींचे आम्ही गुलाम 
चालतो, बोलतो, बघतो

दुनिया सारी सवयीने;
अन्‌ रोजची धावाधाव –

फुरसत नाही थांबाया;
पुजा, अर्चा, खाणे, पिणे,

नशा, झिंगणेही संवयीने;
सत्ता, सट्टाबाजार, ग्यान,

जातपात, वंश, गतकाळ...
मग राही कशाचे भान?

व्यक्तिस्व सदा हरवलेले
स्वातंत्र्यही बाळपणीचे

चालता झुंडीच्या आधारे
अजाणता हातींचे गेलेले

झुंडीत सांडले सगेसोयरे
कसे जोडावे सुटले दुवे?
* * *

पूर्वपिठीका
व्यक्ति आणि समष्टी व नागरी आवास यांत मानवी मापनश्रेणी (human scale) पुनः प्रस्थापित होणे, विशेषतः आजच्या यंत्रयुगात व नागरी पर्यावरणात अनिवार्य झालेले आहे. यांत्रिकी राहणीने व मायावी वास्तवतेच्या प्रभावाने व्यक्तिचे व समष्टीचे जीवन ढवळून निघालेय, अस्तव्यस्त झालेय. त्यात वेग व घाई वाढलीय. ज्ञान व माहिती यांचा संग्रह वाढला पण त्यांचा रवंथ करायला वेळ नाही. परिणामतः समाजाच्या सर्व स्तरांवर सर्जनशीलतेची गुणवत्ता आता किती राहिलीय याचीपण शंकाच आहे. विधायक सर्जनशीलता सर्वांतच असते. ही एकल्या-दुकल्याची मक्तेदारी नाही. अनेकात ती सुप्त असते. तिला जागी करणे ही खरे पाहता समष्टिची जबाबदारी, इतर कोणत्याही संस्थांची नव्हे! पण लक्षात कोण घेणार?
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 06, 2010

मुंबईच्या एका चौपाटीवर (कविता ): मुंबईत आपला परिसर

मुंबईच्या एका चौपाटीवर  
अनेक दर्प, गंध, सुगंध अगणित    
खसखस नायलॉनची 
किलबिल कुणाची    
फडफड पदराची  
वारा येतो गर्दी शोधीत   
गजबज इथे बजबजपुरी  
त्यात तू एक  
अन मी एक  


मीही एक गर्दी शोधीत  
माझे एकटेपण कुरवाळीत गोंजारीत   
उबगलेले उच्छ्वास टाकणयासाठी   
जागा शोधीत   
चौपाटीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत ---  
इथल्या पुळणीतसुध्दां संस्कृतीने घाण करून ठेवली आहे ---  
ढुंगण टेकवीन म्हटले तर.  

मधूनच बाहूला तंग चोळीचा मृदू स्पर्श   
बोटात गुंतवलेली बोटे   
एकांत शोधतात    
कोपरखळी आडोसा शोधीत    
पुराण्या संकेतांचे संवाद   
जवळीक करू पाहतात.     

इथल्या वाळूत वाकडी पावले बोचत नाहीत
इथे असती संवाद - विसंवाद - वाद सतत  
ही एक बजबजपुरी   
त्यात तू एक   
अन मी एक   .
*    *    *    *    *
लेखन १९६५     
टीप: १. मजा अशी कि चाळीस वर्षांनंतर मुंबईचे वातावरण / पर्यावरण किती सुधारले / किती बिघडले हे नागरिकांनी ठरवायचे. चित्रातील वरळी-सी-लिंक बघायला  आकाशात कोण जाणार? सिनेमा - टीवी वरच्या जशा "सेलिब्रिटीज" तसाच हा पूल!! दोनीही नागरिकांच्या खिशाला कात्री लावतात - निष्क्रीय करमणूक करतात. आणि समाजातील एक - दोन टक्के लोकांचे खिसे भरतात.
२. छायाचित्र  रेमीजीयस डिसोजा, मुंबई   

~ ~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

November 24, 2009

नागरता (civilization) इंडियावर मराठी लघुकविता

नागरता किंवा नागर-संस्कृती (civilization) ही लघु कविता इंडियाला उद्देशून आहे. ती सर्व जगाला पण लागू होऊ शकते.
- - -


- - -

आमची देशभक्ति केवळ तळ हातावर मावेल एवढ्या नकाशापुरती नाही. ती ज़मीन, पाणी व माणसा सह समस्त जीवमात्राला सामावते.

उदे उदे करतो आम्ही "पर्यावरण (environment) + पारिस्थितिकी (ecology) + ऊर्जा (energy)" यांचा निसर्गाने दिलेला अतिप्राचीन, अलिखित मूल धर्मं नियम, जो मानव-निर्मित सर्व वस्तू आणि कल्पना-संकल्पना यापेक्षाही सर्वश्रेष्ट आहे, मग ते कला आणि शास्त्रे, धर्म आणि तत्वज्ञाने असोत.

आम्हास जाणीव आहे, नागरतेने वेळोवेळी निर्माण केलेल्या भौतिक / ऐहिक सीमा बदलाच्या अधीन आहेत. एवढेच नव्हे तर पृथ्वीच्या इतिहास काळापासून जमीन व पाणी यांच्या प्राकृतिक सीमा पण संतत बदलत असतात.

टीप:

ही कविता मूळ इंग्रजी "Civilization" या कवितेचे भाषांतर आहे. काही सेवाभावी संस्थानी "राष्ट्रीय एकत्माते" साठी गांधी जयन्ती २००० दिवशी मुंबईत मिरवणूक, व ती "आगस्ट क्रांति उद्यान" येथे सार्वजनिक सभेत परिवर्तित झाली. त्या घटनेत सामिल होण्यासाठी जाताना लोकल ट्रेनमध्ये मूळ इंग्रजी कविता मी लिहिली होती.

ही प्रसिध्द करावयास गांधी जयंतीच्या दिवसाची वाट पहायची मला गरज वाटत नाही.


रेमी डिसोजा
मुंबई

~ ~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape