शंभर कोटी दुय्यम दर्जाचे भारतीय अनुभवाने शिकतात (व शहाणे होतात).
परिणामतः कंपू (युती/आघाडी) करून तगलेल्या लोकसभा!
~ ~ ~ ~ ~ © Remigius de Souza. All rights reserved.
रेमीची मुक्ताफळे १४
"निवारा जेथे घर वसे; घर जेथे हृदय वसे."

"ज्यानी निसर्गाशी संवाद साधून जगणे अनुभवले नाही त्याना नैसर्गिक मरण कसे येणार!"

"सर्वानाच खुश कसे करणार? त्यासाठी विदूषक व्हायला लागते."


अनुभवाची मुळें व्यक्तिगत वातावरणाच्या चारित्र्यात खोलवर रुजलेली असतात.

काम नाही, उद्योग नाही... असे कधी झालेय?
स्वस्थ पडून रहा आणि शोध घे.

पुढची पाच मिनिटे वाट पहाण्यात कधीच निघून गेलेली आहेत!



आज सवड आहे पण वेळ नाही.
काल वेळ होता पण सवड नव्हती.