Showing posts with label नागर-संस्कृती. Show all posts
Showing posts with label नागर-संस्कृती. Show all posts

January 21, 2013

चार माकडांची कहाणी : लेखक, गांधी + गांधी

Image: Source Google Images

चार माकडांची कहाणी : लेखक, गांधी + गांधी

आटपाट राज्य होते. तेथे गांधीबाबाने तीन माकडे सांगितली : कानांवर हात, डोळ्यांवर हात नि तोंडावर हात ! 

इंदिराबाईने एक माकड सांगितले : जननेंद्रियावर हात (असा लोकप्रवाद आहे). संततीनियमन ! त्याच्या परिणामांचा लेखाजोखा कुणी केव्हा केला? माहित नाही.

भारताची लोकशाही सरकारे याचे तंतोतंत पालन करतात. त्यांना रयतेच्या व्यथा दिसत नाहीत, ऐकू येत नाहीत, की त्यावर बोलतपण नाहीत.

चौथ्या धोरणात कोट्यवधी रयत विस्थापित होत आहे. (अर्थात त्यायोगे कुपोषण, उपासमार, रोगराई, आत्महत्या ! अनायासे निर्मूलन आलेच की !)

ही साठा प्रश्नांची लोककहाणी पाचा उत्तरी कुफळ संपूर्ण!


जीवन हे सर्वश्रेष्ठ आहे, सर्व स्थल-कालांत नागरी संस्कृतींनी निर्मिलेल्या सर्व कला, विज्ञाने, धर्म, तत्वज्ञाने, राज्यसंस्था इत्यादिहून सर्वतोपरी उच्चतम आहे. — इति रेमी डिसोजा
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.