August 10, 2009

मेघमल्हार -३: शेताकरयाच्या यातना आणि उल्हास


बी बियाण्यांची पेरी
हुकलेल्या सरी
थेंब थेंब ठिबके झरी
कृष्ण पक्षीं चंद्रकोर
आशा अधांतरी
सरकणारया मेघांवर

(मूळ इंग्रजीचे भाषांतर : लेखन - १९९९-२०००)

शेतकरी केवळ कलावंतच असतात असे नाही, तर नियोजनकार पण असतात. पण नगर नियोजनकारासाराखे नव्हेत, जे बुलडोझर लावून जमीन व तलाव सपाट करतात व जमीनीचे तुकडे पाडतात, शहरें वसवण्यासाठी. शेताकरयाचे नियोजन उंच-सखल जमिनीचा उपयोग पाण्याच्या व जमिनीच्या व्यवस्थनापनासाठी व संधारणासाठी वापरले जाते.

शेतकरी व्यवस्थापन तज्ञ पण असतात। ते जमीन, पाणी, बियाणे, तणे, चारा-वैरण, खते, अवजारे, साठवणी, नेआण, आणि इतर संलग्न अन्न-धान्ये व जनावरांचे पालन इत्यादींचे व्यवस्थापन करतात.
आणि तेवढेच अगत्याचे, ते सतत शेतीच्या दरेक क्षेत्रात संधारण, दुरुस्ती, पारख, सुधारणा, आणि धोरण आखणी करीत असतात. हे सर्व त्याना उपलब्ध साधन सामग्रीतून ते करतात.
शेतकरी कदाचित निरक्षर असले तरी "अशिक्षित" नसतात, जसे काही उच्चभ्रू मंडळीचा समज असतो.

~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

No comments:

Post a Comment