September 23, 2010

नारळीचे नागरीकरण: आपला परिसर

नवी मुंबईला गेलो होतो. इथे बरंच काही मुंबई सारखेच आहे. फक्त जुन्या इमारती नाहीत. निवासी संकुलांची बांधकामे जोरात चालू आहेत. दहा - वीस मजली टोलेजंग इमारती बांधल्या जात आहेत. इथे राहायला आलेले घर मालक हौशी आहेत. रस्त्यांच्या कडेला अरुंद फ़ूटपाथवर कुणी अशोकाची कुणी पांगारयाची  झाडे लावलीत. झाडांच्या भोवती कांक्रीटाची फरशी,.माती जवळ जवळ नहीच.   
 

रस्त्याच्या कडेस जमिनीच्या एका चिंचोळ्या पट्टीवर नारळी लावल्या आहेत. दोन झाडांमधले अंतर जेमतेम दीड - दोन वाव असेल. सुदैवाने सभोवती माती आहे - फारश्या नाहीत. ही झाडे वाढली कि त्यांची सूर्य प्रकाश मिळावा म्हणून चुरस लागेल. झावळ्या एकमेकांना आलिंगने चुंबने द्यायला लागतील. 
 




वरील दुसरे चित्र कोंकणातील सावंतवाडी येथील संमिश्र शेतीचे आहे.
 
असे सांगतात: ज्या प्रकारच्या नगरात - परिसरात लोक राहतात त्याचा त्यांच्या स्वभावावर परिणाम होतो. जमिनीपासून दूर लहान - मोठ्या चौकोनी खुराड्यात राहणाऱ्या लोकांचा स्वभाव या झाडांच्या लागवडीत (वाटल्यास त्याला उपवन म्हणा) प्रतिबिंबित झालेला दिसतो. लहान - मोठ्या गाळ्यांत राहणारी कुटुंबें उद्या वाढणार - हे सरकारला तसेच वास्तुविदाना, नागरानियोजकाना पण माहित नसते. मग येथे राहणाऱ्या कुटुंबियांना नारळीला किती जागा लागते कसं माहित असणार? ते थोड्या जमिनीला जास्तीत जास्त कसे राबवायचे याचा विचार करतात. माळ्याला तरी माहित असावे! पण तो पडला हौशी हुकुमाचा ताबेदार.  

जागेच्या स्वभावावरून एक आख्यायिका आठवली. बडोद्याला एकदा आम्ही वयोवृध्द प्राध्यापक मुजुमदार यांना भेटायला गेलो होतो. त्यांनी या संदर्भात पुढील म्हण सांगितली.

"सुरतनी नार सुंदरी       
खंभातनी नार गोजिरी
वडोदरा नी वांकी नारी
अमदाबादी हरामजादी" 
(टीप: वांकी - चतुर, बडोद्यात बायकांचा हा गुण मात्र मी अनुभवलाय. या कवितेत सांगितलेली वैशिष्ट्ये अर्थातच काही नियम नव्हे.)
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

No comments:

Post a Comment