![]() |
Save Forests-Save Lives |
जगभर वनमहोत्सव – आंतरराष्ट्रीय वन वर्ष २०११:
सांगणारे कोण - करणारे कोण?
सांगणारे कोण - करणारे कोण?
युनोने – राष्ट्रसंघाने – वर्ष २०११ वन वर्ष जाहीर केलेय असे ऐकिवात आहे.
'सौ चूहे खाकर बिल्ली हज़ करने चली' अशी एक म्हण आहे. युनो आपले पुरोहिताचे काम चालू ठेवते. आता आणखी एक विधी. या संस्थेवर कुणाचें वर्चस्व चालतें हें सांगायला नकोच!
या निमित्ताने मला चाचा नेहरूंची आठवण होते. त्यांनी पण वनमहोत्सव हा विधी सुरु केला होता. नर्सरीतून आणलेली झाडे लावायची, टाळ्या वाजवायच्या आणि विसरून जायचे. त्यांची निगा राखायला कोणाला फुरसत आहे? अशी स्थलांतरित केलेली वानसे सहसा टिकत नाहीत. वादळ आले की उन्मळून पडतात.
ज्यांचे हितसंबंध खाणी, लाकूड-उद्योग, नव्या वसाहती बांधणे, महा-धरणांचे बांधकाम इत्यादि उद्योगधंद्यांशी गुंतलेले आहेत ते सोयीस्कर दुर्लक्ष करतील. ज्यांचे पालनपोषण वने करतात – आदिवासी व किसान – त्यांना 'युनो' काय चीज आहे माहितही नसेल. अपघाताने माहित असलेच तर या विधीची चाहूल पण लागली नसेल. सरकारें व इतर कांहीं संस्था कदाचित एक दिवस सभासंमेलने भाषणे आयोजित करून हा विधी साजरा करतील झाले.
असे विधी चाकोरीत राहून चालतात. साकल्याने – holistic – बघायला फुरसत आणि संवय कुणाला आहे? याचे एक उदाहरण देतो.
'वाघोबांना वाचवा' मोहीम चालली होती तेव्हाची गोष्ट. एका मोबायल कंपनीने या मोहिमेचा भाग म्हणून पोस्टर दैनिक पेपरात प्रसिद्ध केले. अर्थात ही चक्क 'जाहिरातबाजी' होती. मी पण निर्लज्जपणे त्या पोस्टरचे विडंबन केले; खरं म्हणजे सर्जनशील दुरुस्ती केली.
वाघांना कोण वाचवणार? सकाळचा चहा घेताना पेपर चाळणारे माझ्यासारखे वाचक? ते फारतर आणखी एक मोबायल विकत घेतील गरज नासताना. सरकार वाचवणार? सरकार कायदे करते, घोषणा - आश्वासने देते, पण क्षेत्ररक्षण किंवा अंमलबजावणी करताना डळमळते.
![]() |
SAVE OUR TIGERS Campaign Corrected by Remigius de Souza |
मी माझ्या मतीप्रमाणे विचार करण्याचे स्वातंत्र्य मात्र घेतों. आणि मी दुरुस्ती केलेले पोस्टर माझ्या इंग्रजी ब्लॉगवर प्रसिध्द करतो (दुवा पहा: SAVE OUR TIGERS Campaign Corrected).
सर्वार्थाने क्षेत्ररक्षण, वनांचे – वाघांचे संरक्षण करणे सामान्य जनतेच्या हाती असते, केवळ सैन्य व पोलीस करू शकत नाहीत. पण सरकारने त्यांचीच आबाळ केली तर काय साध्य होणार? आतंकी, अतिरेकी, नक्क्षलवादी, दंगेखोर यांचे मात्र फावते.
याच्यावर पण, केले तर, ईलाज आहेत: १. सत्तेचे विकेंद्रीकरण आणि २. जनतेच्या स्वायत्ततेचे संधारण. पण कोणत्याही सत्ताधिशांना हे कदापि रुचरणारे नाही हे पण आम्हाला माहित आहे. एवढेच काय, उच्चभ्रू व बुध्दिवादी मध्यमवर्गीय यांच्यापण गळीं उतरणार नाही!
~~~~~~
आम्ही, या देशाची जनता, [नागरिक हा शब्द मी टाळतो] सृष्टीमातेच्या कृपेने किती भाग्यवान! आमच्या भाग्यांत वानसांचा वांटा फार मोठा, महत्वाचा! अन्न - निवारा - वस्त्र, आयुर्वेद, कागद, रंगरोगण एवढेच नाही. तांत्रिक व जादूटोणा करणारे पण वानसांचा उपयोग करतात.
ReplyDelete