November 28, 2011
November 25, 2011
मी अण्णा हजारे नाही: डायरीचे पान
मी अण्णा हजारे नाही. लोकपाल विधेयक किंवा जन लोकपाल विधेयक, एकाचाही मसुदा मी वाचलेला नाही. आता पर्यंत या विषयावर झालेल्या गदारोळांत एवढी ऊर्जा वाया गेलेली आहे! पण वर्तमानपत्राचे एक पान या विधेयकांचा मसुदा प्रसिद्ध करण्यासाठी वापरले नाही; ना सरकारने ना चळवळ्यानी. असं कांही फुकटात वाचायला मिळाले असते तर त्यावर मी माझा अभिप्राय अवश्य लिहिला असता.
कोणतेही विधेयक पास होवो. हितसंबंधी लोक त्याचा बोर्या वाजवणार, ते हायजैक करणार. मग ते राजकारणी असतील, उद्योजक असतील, सरकारी कर्मचारी असतील किंवा सफेद कालरवाले गुंड असतील. जेथे कायदा करणारेच कायदा धाब्यावर बसवतात म्हणून आज तुरुंगांत बसवले आहेत, हे आपण पाहतोच. तेथे इतरांचे काय?
अण्णानं जर लोकसहभागाने गांवांना हरीत करण्याची मोहिम चालू ठेवली असती, आजुबाजूच्या चार गांवांत नेली असती तर वेगळा इतिहास घडला असता. हे 'हरित गांव' विधायक काम आहे, पण एवढे एक अण्णाचं गांव पुरेसे नाही. त्यानं काय आकाशाला ठिगळ लावणार? नाही तरी आम्हाला एका पिसाने मोर व्हायला आवडते.
[२१:५९, शनिवार १७-०९-२०११]
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
कोणतेही विधेयक पास होवो. हितसंबंधी लोक त्याचा बोर्या वाजवणार, ते हायजैक करणार. मग ते राजकारणी असतील, उद्योजक असतील, सरकारी कर्मचारी असतील किंवा सफेद कालरवाले गुंड असतील. जेथे कायदा करणारेच कायदा धाब्यावर बसवतात म्हणून आज तुरुंगांत बसवले आहेत, हे आपण पाहतोच. तेथे इतरांचे काय?
अण्णानं जर लोकसहभागाने गांवांना हरीत करण्याची मोहिम चालू ठेवली असती, आजुबाजूच्या चार गांवांत नेली असती तर वेगळा इतिहास घडला असता. हे 'हरित गांव' विधायक काम आहे, पण एवढे एक अण्णाचं गांव पुरेसे नाही. त्यानं काय आकाशाला ठिगळ लावणार? नाही तरी आम्हाला एका पिसाने मोर व्हायला आवडते.
[२१:५९, शनिवार १७-०९-२०११]
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Labels:
लोकशाही,
स्फुट-लेखन
November 22, 2011
घायपात बहरे मुंबई शहरी
घायपात बहरे मुंबई शहरी
अलभ्य लाभ ! मुंबईत रस्त्याच्या चौकात हे वानस बघायला मिळणे दुर्मिळ, आणि शहरातपण कुठेही. कुणी समंजस कलावंताने त्याचा उपयोग उपवन वानस म्हणून केला होता. तोही सुबक रीतिने : वहानवाहक व पादचारी यांच्या दृष्टीला अडथळा न आणता.
आणि मी पाहिले माझ्याशिवाय तेथे आणखीही कोणी होते. त्या होत्या छोट्या मधमाशा, घरमाशीपेक्षा लहान. मी फोटो घेत होतो, त्या मध घेत होत्या.
घायपात त्याच्या मजबूत तंतूसाठी प्रसिद्ध आहे. आणि खेडूत त्याचा यथायोग्य उपयोग करतात. भारताच्या जैविविधतेत तंतू देणारी अनेक वानसे आहेत : माड, कपास, अंबाडी, भेंड. शेवरी, केळ, अननस, ताग इत्यादि.
घायपाताच्या पानांतून तंतू मिळतात. तर अंबाडीच्या फाद्यांतून ६-८ फूट लांब तंतू काढता येतात. शेतकरी, कोळी, आदिवासी इ. लोक यांच्यातून मासेमारीची जाळी विणतात.
हे दोर सिंथेटिक दोरापेक्षा अधिक टिकाऊ असतात. हीं जाळीं जेवढी पाण्यात भिजतात तेवढी अधिक मजबूत होतात. या उलट सिंथेटिक दोर व जाळीं कोरडी राहिली कि कांही दिवसांनी आपोआप विशीर्ण होत जातात.
या चित्रातील घायपात बंदिस्त जागेत वाढवलेली उपरी वानसे आहेत. यांचा फुलोरा पाहिला कीं कुणाच्याही ध्यानात येईल हीं झाडें बाहेरून दिलेल्या खत-पाण्यावर पोसलेलीं आहेत. त्यांना जमिनीतून काहीही पोषण मिळत नाही. थोडक्यात हीं परावलंबी झाडें आहेत.
या पर्यावरणाचा त्यांच्या वाढीवर परिणाम झाल्यावाचून कसा राहिल ? नैसर्गिक मोकळ्या अवस्थेत यांची पाने पांच फूटाहून अधिक वाढली असतीं.
पिंजर्यातले पक्षी, कांचेच्या टांकीतले मासे, कुंडीत लावलेलीं झाडें आणि मुंबईच्या फूटपाथवर लावलेली शोभेची झाडे यांचे पण असेच होते.
मग आपलें - शहरवासियांचें - काय होत असेल बरें? हीं शहरें आमचें व्यक्तिस्व सर्वार्थाने – शारीरिक, मानसिक (व आत्मिक) – बहरायला, फुलायला कारणभूत होतात का?
असे हे प्रश्न माझे मीच स्वतःला विचारायचे, आणि उत्तरही मीच शोधायचे. गंमत अशी : या प्रश्नांतच त्यांचे उत्तर आहे !
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
![]() |
फोटो १- घायपात, मुंबई |
आणि मी पाहिले माझ्याशिवाय तेथे आणखीही कोणी होते. त्या होत्या छोट्या मधमाशा, घरमाशीपेक्षा लहान. मी फोटो घेत होतो, त्या मध घेत होत्या.
घायपात त्याच्या मजबूत तंतूसाठी प्रसिद्ध आहे. आणि खेडूत त्याचा यथायोग्य उपयोग करतात. भारताच्या जैविविधतेत तंतू देणारी अनेक वानसे आहेत : माड, कपास, अंबाडी, भेंड. शेवरी, केळ, अननस, ताग इत्यादि.
घायपाताच्या पानांतून तंतू मिळतात. तर अंबाडीच्या फाद्यांतून ६-८ फूट लांब तंतू काढता येतात. शेतकरी, कोळी, आदिवासी इ. लोक यांच्यातून मासेमारीची जाळी विणतात.
हे दोर सिंथेटिक दोरापेक्षा अधिक टिकाऊ असतात. हीं जाळीं जेवढी पाण्यात भिजतात तेवढी अधिक मजबूत होतात. या उलट सिंथेटिक दोर व जाळीं कोरडी राहिली कि कांही दिवसांनी आपोआप विशीर्ण होत जातात.
![]() |
फोटो २- घायापाताचा फुलोरा, मुंबई |
या पर्यावरणाचा त्यांच्या वाढीवर परिणाम झाल्यावाचून कसा राहिल ? नैसर्गिक मोकळ्या अवस्थेत यांची पाने पांच फूटाहून अधिक वाढली असतीं.
पिंजर्यातले पक्षी, कांचेच्या टांकीतले मासे, कुंडीत लावलेलीं झाडें आणि मुंबईच्या फूटपाथवर लावलेली शोभेची झाडे यांचे पण असेच होते.
मग आपलें - शहरवासियांचें - काय होत असेल बरें? हीं शहरें आमचें व्यक्तिस्व सर्वार्थाने – शारीरिक, मानसिक (व आत्मिक) – बहरायला, फुलायला कारणभूत होतात का?
असे हे प्रश्न माझे मीच स्वतःला विचारायचे, आणि उत्तरही मीच शोधायचे. गंमत अशी : या प्रश्नांतच त्यांचे उत्तर आहे !
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Labels:
जैवविविधता,
सृष्टी
November 18, 2011
रेमीची मुक्ताफळे -१६ : पर्यावरण
सृष्टीच्या कार्यात "पर्यावरण, पारिस्थितिकी व ऊर्जा" यांचे स्वतंत्र खातेवाटप नाही; ते परस्परसंबंधी व अधिव्यापी घटक असतात. सृष्टीच्या निर्मितीत काटोकाट मितव्यय असतो आणि त्या वस्तूचे – जैव अथवा अजैव – आयुष्य संपल्यावर अवशिष्टाचे पुनश्चक्रण (recycling) होते.
आधुनिक औद्योगिक संस्कृती मात्र हा पाठ शिकली नाही.
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
November 15, 2011
रेमीची मुक्ताफळे-१५
Labels:
Image,
जीवन शैली,
शरीर-धर्मं,
सृष्टीयोग
November 10, 2011
काळाचा महिमा
काळाचा महिमा
![]() |
प्रतिमा: अस्थिवर चंद्र-कला (सुमारे ३०,००० वर्षांपूर्वी) |
खरं पाहतां काळ, Time, चालतबिलत नाहीं. आमचा देशी 'समय', घटका पळं प्रहर... कांहींही म्हणा, पृथ्वी, चंद्र, सूर्य, नक्षत्रमाला यांच्याबरोबर चक्राकार फिरत असतो, cyclic असतो. तो अर्थातच सृष्टीशी जोडलेला असतो. यास्तव आपण सहज बोलून जातों, 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती'.
हा दोन समाजांतील सांस्कृतिक फरक आहे. संस्कृती ही सृष्टीची मानवाला त्याच्या उत्पत्तिपासून मिळालेली देणगी आहे. जेव्हा समाज-धर्म-राज्य-न्याय इ. संस्था कांही स्वार्थी बलिष्टांनी निर्माण केल्या नव्हत्या तेव्हापासून !
खरं तर काळ बदलत नाही. बदलत असते सामाजिक परिस्थिती कांही बलवानांच्या इशार्यावर. बदलतों आम्ही; बदलतात आमच्या संवयी आणि श्रद्धा; आणि त्याच आमचा धर्म होऊन बसतात; त्याच अंतिम सत्य आहेत वाटूं लागते. यांना धक्का लागलेला आपणांस खपत नाही.
तर्क आणि विवेकबुद्धी वापरून कोणत्याही विधानाचा, घटनेचा वा परिस्थितीचा छडा लावणे आपण टाळतो, क्रिकेट असो कि कारगिल.
त्याऐवजी आपणास 'शब्दाप्रमाण्यावर' वर विश्वास ठेवणे सोयीचे वाटते. वस्तुनिष्ठेपेक्षा व्यक्तिनिष्ठा, विभूतीपूजा आपणास अधिक भावते. शारिरिक, मानसिक, बौद्धिक गुलामगिरीचे जूं मानेवर घ्यायला आपण नेहमीच तत्पर. डोक्याला त्रास नाही! गोपाळ गणेश आगरकर किती लोकांस आठवतात बरें!
औद्योगिक समाजावर वेळेचा पगडा विलक्षण आहे. रोजव्यवहारात एक म्हण आहे : "Time is Money", समय म्हणजे पैसा; असं वेळेचं मूल्य-मापन केलं जातं. जसं जमीन व जळ यांनापण पैशानं मोल लावलं जातं. खरंच, वेळेचं मूल्य, किंमत, उपयोग व लायकी जीवनाकडे पाहतां काय आहे? अशा वेळेला पैशाचे मोल लावायच्या कल्पनेला कोणी आव्हान दिल्याचं ऐकिवात नाही. पण तीही वेळ येईल.
। कालाय तस्मै नमः ।
![]() | ||
Scale-drawing by Marshak A. (1970) |
"गॅलिलियोचा दोलक"
अलिकडच्या 'काळीं' गॅलिलियोने 'वेळ' या आधुनिक संकल्पनेचा व साधनाचा शोध लावला, जसे न्युटनचे 'सफरचंद'. चर्चमध्ये बसला असता त्याने वर दोलायमान होत असलेले झुंबर पाहिले मात्र ! हा गॅलिलियोचा 'दोलक' (दुवा पहा : Galileo and the Pendulum) ! आज विज्ञान व्यवसाय (proffesion) झाले आहे, कधी ते कारागिरी (vocation) होते. गॅलिलियो (संक्षिप्त चरित्र) अर्वाचीन विज्ञानाचा जनक समाजाला जातो.
टीप: वरील चित्र मी प्रथम John C. Eccles यांच्या "Evolution of the Brain: Creation of the Self " या पुस्तकांत व त्याच्या मुखपृष्ठावर पहिले. चित्रातील (b) हे प्रमाणबद्ध रेखाचित्र Marshack, A. (१९७०) या वैज्ञानिकाने केले होते (Source: Internet). ही चित्रे येथे निवडायचं कारण: यात "काळा"चं प्रतिक चित्रित केलेलं आहे.
अलिकडच्या 'काळीं' गॅलिलियोने 'वेळ' या आधुनिक संकल्पनेचा व साधनाचा शोध लावला, जसे न्युटनचे 'सफरचंद'. चर्चमध्ये बसला असता त्याने वर दोलायमान होत असलेले झुंबर पाहिले मात्र ! हा गॅलिलियोचा 'दोलक' (दुवा पहा : Galileo and the Pendulum) ! आज विज्ञान व्यवसाय (proffesion) झाले आहे, कधी ते कारागिरी (vocation) होते. गॅलिलियो (संक्षिप्त चरित्र) अर्वाचीन विज्ञानाचा जनक समाजाला जातो.
टीप: वरील चित्र मी प्रथम John C. Eccles यांच्या "Evolution of the Brain: Creation of the Self " या पुस्तकांत व त्याच्या मुखपृष्ठावर पहिले. चित्रातील (b) हे प्रमाणबद्ध रेखाचित्र Marshack, A. (१९७०) या वैज्ञानिकाने केले होते (Source: Internet). ही चित्रे येथे निवडायचं कारण: यात "काळा"चं प्रतिक चित्रित केलेलं आहे.
या शिल्पाची कला, विज्ञान वा खगोलशास्त्र अशी वर्गवारी लावणे चूक ठरेल. या आदिमकाळातील कांही भित्तीचित्रे व शिल्पे संशोधकांना सापडली आहेत.
वरील चंद्र-कला कोरताना या कलावंताने केलेला साधनांचा मितव्यय (economy) विशेष महत्वाचा आहे. नाहीतर आमचे बॉलीवूड-टेलीवूड वरचे कार्यक्रम पहा! वेळेचा आणि पैशाचा धूर! तूप नाही; तेल नाही; हातीं धुपाटणं घेऊन परतायचं!
त्यांच्या नृत्य, काव्य, संगीत इ. कलांची कल्पनापण आज करता येणार नाही. पण त्यांची प्रतिभा, मौलिकता, कल्पकता व सर्जनशील निर्मिती कोणत्याही युगापेक्षा रतीभरही उणी नसणार. तीपण अत्यंत बिकट वातावरणांत केलेली! मग आपण सुधारणा म्हणतो ती कुणाची / कशाची?
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Labels:
कला,
काळ-Time,
पुरातत्त्व,
विज्ञान,
संस्कृती
Subscribe to:
Posts (Atom)