![]() |
आभार : Flowers of India |
![]() |
आभार : Flowers of India |
पळस
वैशाखाच्या मध्यान्ही
पळसाच्या पाकळ्यांचा
उल्हास
उजळतो राने डोंगर.
(ले. १६-३-८४)
टीप: वरील प्रतिमा Flowers of India या वेब साईटवरून घेतल्या आहेत.
पळसावर काळाचा वास असतो अशी श्रध्दा आहे. काळ म्हणजे मृत्यू, समय, प्रेम, काळ म्हणजे यम. "पळसाला पाने तीन" अशी म्हण आहे. होळीत या फुलांचा रंग पूर्वीच्या काळी वापरत असत. या रंगाच्या पाण्याने आंघोळ केल्याने चामडीचे रोग दूर होतात. हा मूळ भारतीय वृक्ष आहे. सुधारलेल्या आधुनिक पलास पलास सिंथेटिक रंग वापरतात. अन् जंगले नष्ट होताहेत. त्याबरोबरच वानासांची सामान्य माहितीपण नाहीशी होतेय.
काही वर्षांपूर्वी मुंबईत होळी उत्सवात माझ्या एका सहाकारयाची लहान पुतणी विषबाधेने वारली व तिच्या बरोबरीची आठ मुले अत्यवस्थ झाली होती. त्यांच्याच शेजारी तरुणाने कौतुकाने ते रंग मुलाना आणून दिले होते. आयत्या आलेल्या सुधारणेची पारख कोण, कशी, केव्हा करणार? या घटनेला तीस वर्षे झाली तरीही अशा घटना आजही सुवर्णनगरी मुंबईत घडतात.
पळस
~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
No comments:
Post a Comment