July 15, 2010

संधिप्रकाश मंडल: विसाव्या शतकाचे श्राध्द

 (मूळ "Twilight Zone" (१६-०८-१९९९)  या प्रकाशित इंग्रजी कवितेचे स्वैर भाषांतर: पहा दुवा )
संधिप्रकाश  (Image Source: Internet)
गवाक्ष कुटीचे - नजर जगतावर 
सरकते पुढे पुढे, ढगांच्या पंखांवर
यात्रा दिवस-रात्रीच्या संधीवर 
जेथे धरती व तारकांचा वसे परिवार 
येथे ना कुणी स्पर्शू करू शके, येथे ना
स्थान कःपदार्थ सिध्दांताना
व्यापार, राजकारण अन् दर्शनांच्या; 
अन भूचरांना जयाना नसे घरोबा 
वसुंधरा व दिवाकराशी, जे जगतात
आत्मप्रतारणेत अन फुगवलेल्या वादंगांत
प्रमाणाबाहेर. काम - काम - काम,
काम जो सोडीजे मागे भव्य भग्नावशेष 

दैवते, भगत, जे जगती देऊन प्रवचने   
मुक्तीच्या आशेची व उभारती स्मारके
रक्ताच्या साड्यांवर भूचारांच्या, जे जखडलेले 
सर्वकाळ अराजकांच्या साखळदंडांत.









पावन आहेत गांडुळे दुरस्त 
सार्वजनिक नजरेआड, ते नाही निर्मित
धर्मशास्त्रे वा स्मारके आपल्या

विष्टेतून वारसांसाठी, वा  संहार जीवनाचा.



रेमीची स्-प्रतिमा 
*    *    *    *    *
टीप: १. प्रतिमा - गांडूळे, मृदा संधारण करणारा पर्यावरणातील एक महत्वाचा जीव, जो अजूनपर्यंत दुर्लक्षित होता.  
२. प्रतिमा - रेमीची स्व-प्रतिमा, विसाव्या शतकाचे प्रतिक - स्वत:चेच एक विडंबन चित्र   
३. प्रतिमा: संधिप्रकाश (source - Internet )

~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

July 06, 2010

वटपौणिमा: मुंबईत आपला परिसर


 सावित्री-सत्यवान ही पौराणिक गोष्ट सवश्रूत आहे. मन, संवेदना, जाणीव व बोधना यांची पकड घेणारी ही सर्वस्पर्शी कथा सार्वकालिक (timeless) आहे; तिला प्रशस्तीपत्रे बहाल करणारा मी  कोण?
पण माझ्या कुवतीनुसार ही कथा व परंपरा यांची काही लक्षणे ध्यानात आली ती मात्र मी इथे नमूद करतो.

सावित्री: 

स्त्रीशक्तीच्या विलक्षण सामर्थ्याचे दर्शन या कथेत होते. ही कहाणी स्त्रीमुक्तीच्या आधुनिक सुधारक जमान्यात कुठे बसते बरे? तिने आपल्या सामर्थ्याने यमाला - मृत्यूला - पण नमवले.
ही कथा किती लोकांनी वर्षानुवर्षे पुन्हा पुन्हा कथा काव्यातून संपादित केली असेल? एका कवितेतील वाक्य आठवते: "सप्त पदे सख्य साधुशी घडते", सावित्री यमाला सांगते. श्री अरविंद यांनी तर इंग्रजीत महाकाव्य लिहिलेय. (मी ते वाचलेले नाही. एक तर माझे इंग्रजी जेमतेम; अन त्याची जाडी पाहून वाचायचा धीर झाला नाही.) यामुळे भारतीय स्त्रीच्या दर्जात काही फरक पडला का?


इंडिक (Indic) संस्कृतीत सामाजिक आणि/किंवा धार्मिक परंपरा --- पूजाअर्चा, विधी, उत्सव, कथा, कीर्तन, लोककला इ. अनेक अभिव्यक्तीनी साकारलेल्या आहेत.जळ, जमीन, वानसे,व प्राणी यांच्यांशी निगडीत आहेत. भूसृष्टी प्रमाणे त्या खसृष्टी व ऋतुचक्राशी पण जोडलेल्या आहेत.
परंपरा म्हणजे जिवंत इतिहास. अन स्त्रियांनी तर परंपरा, पर्यायाने संस्कृती, जपण्यास सर्व काळात व सर्व देशांत फार मदत केलेली आहे.
इंडिक संस्कृतीतील अनेक परंपरांत पर्यावरण (साकल्याने, पर्यावरण, पारिस्थितिकी व ऊर्जा, तीनहि) पायाभूत आहे.
या परंपरा सर्वसमावेशी असल्याने साकल्याचे (holistic) द्योतक आहेत. असा हा यांचा आवाका प्रचंड आहे जो तथाकथित धर्मश्रध्देच्या पार पुढे जातो. 

ज्या काळात आजच्या सारखी सांघिक शिक्षण (mass education) नव्हते तेव्हा या परंपरा पिढ्यान पिढ्या "लोकाभिमुख लोकशिक्षणाचे साधन" झाल्या. 

वट पूजेच्या दुसर्‌या दिवशीच्या भटकंतीत रस्त्याच्या बाजूला अनेक ठिकाणी वडांची पूजा झालेली दिसली. तेथे निर्माल्य पडलेले होते. हे निर्माल्य कोठे जाते?
ते असंख्य जीव जीवाणूंचे अन्न असते, उरले सुरले भूमीत सामावते - अन्न ब्रम्हाच्या कारणी लागते, त्यावर वृक्षांचे पोषण होते. मुंबईत मात्र उरले सुरले अन्न गटारात किंवा शहराच्या कचऱ्यात जाते.   

सावित्रीच्या कथेत तीन पात्रे: सावित्री, सत्यवान अणि यम आहेत. तरीही सर्व पुढील पिढ्यांना वडाची कुणी महाभागाने पूजा करायला लावली. तो (किंवा अनेक) दृष्टा महापुरुष असणार. संशोधक सांगतात,  वृक्षपूजा आदिवासी - आदिम जमाती - यांच्यापासून चालू होती (दुवा: आनंद कुमारस्वामी).     

वटवृक्षाचे महात्म्य:
वड विलक्षण कणखर वृक्ष आहे. ज्या जमिनीत वाढतो तेथे पाण्याचा साठा तयार होतो व वाढतो. या झाडावर पशू पक्षी यक्ष वास करतात. हा वृक्ष हजारो वर्षें जगतो अन याचा विस्तारही विशाल होतो.

"सत्तेचे विकेंद्रीकरण"
वडाचा बहुमोल धडा
विशालकाय वडाचे टिकून राहण्याचे रहस्य आहे त्याच्या अनेक खोडांमध्ये. जसा हा वाढत जातो तशी याची पारंब्यांतून नवीन खोडेपण तयार होत जातात. आणि त्याच्या विस्ताराचा डोलारापण सांभाळतात. गुजरातेत "कबीरवट" स्थान आहे. त्याच्या सावलीत पिकनिकला जाणारे शेकडों लोक एका वेळी आसरा घेतात. माडासारखा उंच वाढला तर एवढा डोलारा घेऊन हा टिकूच शकणार नाही. 

आजचा समाज फार पुढारलेला किंवा सुधारलेला असेल. तरीही अजून लोक वडाची पूजा करतात. पण त्याच्यापासून बरेच काही शिकण्यासारखे आहे हे पण ध्यानात घ्यायला हवे. आणि "सत्तेचे विकेंद्रीकरण" शिकणे तर आज फार अगत्याचे झालेय.

सत्ता असो, राज्य असो, संस्था असो की शहर असो, त्यांच्या वाढीबरोबर त्यांचे विकेंद्रीकरण करणे ईष्टच नव्हे तर अपरिहार्य असते, नाहीतर त्यांचे विघटन अटळ समजाच! कारण मानवी सत्तेला निसर्गाची मान्यता नाही, कधीच नव्हती. पण हे गोऱ्या चामडीच्या लोकांना कधीच समजले नाही; त्यांच्या एतद्देशीय चमच्यांना पण नाही; विज्ञानाच्या आजच्या तथाकथित विकासानंतर पण नाही! हा दैवदुर्विलास तर नाही? नाही, हा सत्ता-दुर्विलास आहे. 


सत्तेचे केंद्रीकरण 

शहर हे सत्तेचे प्रतीक आहे, अगदी इतिहास काळापासून. मग त्या सत्तेचे स्वरूप - धार्मिक, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक वा राजकिय - कोणतेही  असो. केंद्रीत सत्ता अमर्याद वाढली कि कोलमडते. ब्रिटिश साम्राज्य, सोवियट रशिया, रोम शहरातील पोपचे साम्राज्य... चेर्नोबिल ही काही याची उदाहरणे.  
लंडन, न्युयॉर्क, पारिस इ. जागतिक महानगरातील सामान्य माणसाच्या दैनंदीन जगण्याची गुणवत्ता मला माहित नाही, पण त्याबद्दल मला शंका मात्र जरूर आहेत.  
सत्तेचे केंद्रीकरण जसे वाढत जाते तसे सत्तेची बैठक जेथे असते ते शहर पण वाढते. सत्तेच्या प्रमाणात ते नगर, महानगर, जागतिक नगर (Global City) होते.

"अंकोर वट" (कंबोडिया) या बाराव्या शतकातील मंदिरासवे "अंकोर" ही हिंदू राजाच्या राजधानीचे महानगर (सुमारे १००० चौरस मीटर क्षेत्रफळ) होते. तंत्रज्ञानात ते राज्य त्यावेळी पुढारलेले होते. पण सत्तेचे अनिवार केंद्रीकरण  त्या राज्याच्या व शहराच्या विनाशाला कारणीभूत झाले. अशी कैक उदाहरणे इतिहासात आहेत. (दुवा:
http://en.wikipedia.org/wiki/Angkor)

मुंबई महानगर इथे डोळ्यासमोर आहे. येथे सामान्य जनांच्या जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात --- पाणी, अन्न, सांडपाणी-मैला, आरोग्य, शिक्षण इ. --- यांचे  व्यवस्थापन कोलमडले आहे. प्रचार काहीही असो. मुंबई केवळ "सूजीचे मोठेपण" मिरवते.
फक्त चांगले तेवढेच पहायचे, बाकी सर्व नजरेआड करायचे म्हणजे स्वतःशीच प्रतारणा करणे, दुसरे काय? हे खरे आपण "भोगवादी" झाल्याचे लक्षण!  

फिरंग्यांच्या संसर्गाने तथाकथित सुधारलेल्या शहरी लोकांनी  निसर्गापासून फारकत घेतली, वेगळेचार केला -- त्याला वेगळ्या खात्यात टाकले; निसर्ग केवळ भोगवस्तू झाली. विधी राहिले, अर्थ हरवले.


बाजारू व यांत्रिकी मुंबई शहराने नागरिकांचे आचार-विचार-सवयींचा ताबा घेतला, सवयी, समजुती, आचार, विचार... साचेबंद झाले, दृष्टीचा ताबा मायावी सृष्टीने /  वास्तवतेने (virtual reality) घेतला. मग "विधायक सर्जनशीलतेचे" काय झाले? विधायक असो कि विघातक असो, सर्जनशीलता समाजातील दोन टक्के लोकांच्या हाती गेली, त्यांची मक्तेदारी झाली; सत्तेसाठी व नफ्यासाठी सर्जनशीलता राबवली गेली - जाते. बाकीच्या लोकांनी फक्त "हो" ला "हो" द्यायचा.       

संधीकाळ
तरीही भल्या पहाटे कोकिळ, कावळे, साळुकी, कुकुडकोंभा इ. पक्षी साद घालतात, कुठेतरी कोंबडा आरवतो. भल्या पहाटे गांडुळे मातीत पुन्हा अदृश्य होतात. भल्या पहाटे सकाळपाळीचे लोक ४:५५  ची लोकल पकडण्यासाठी निघाले आहेत; त्याना माणसांच्या दुनियेबाहेर काय चाललेय याचे भान असते का माहित नाही.  भल्या पहाटे वारली बाया पळस, कुडा इ. पानांचे भारे घेऊन फूलबाजाराचा रस्ता तरातरा पार करतात. त्यांचे मात्र या कॉंक्रिटच्या जंगलातपण अवधान जागरूक असते.  


टिप: १. छायाचित्रे, वट पौर्णिमा १ व २ | रेमीजीयस डिसोजा. २. 'सूजीचे मोठेपण': कोकणी वाक्प्रचार, अर्थ स्पष्ट आहे.
--- रेमीजीयस डिसोजा 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

June 25, 2010

श्रम गेले गटारात

येथल्या गटारांतूनही
या शहरी जीवनात आशा आहे काही
गाळून सोने काढायची
पण येथल्या मूढमतींकडून काहीच नाही --
दिसायला ते शोभिवंत
परि असती ते भोगवादी बाजारू वस्तू --
करिती फक्त पोपटपंची
त्यांचे प्रतिसाद उथळ, भेदी त्यांचे कारक व्यापार

काय अपेक्षा करणार
या संवर्धित कृत्रिम फुलझाडांकडून
घडवले जयाना जुळवणी पंक्तिवर
या संस्कृतिने, जी सदा मदमस्त संमोहित सुखात नि अवशिष्ट निर्मितीत?
नाही फुले. नाही फळे.
ना सर्जनशील कर्म. नाही मुक्ति. 

*  *  *
(माझ्या मूळ इंग्रजी कवितेचे स्वैर भाषांतर)   
टिप: (१) सेकंदाला फक्त एक पैसाः सेलफोनवर बोलायचा दर! मात्र रोजचया व्यवहारातून एक, दोन, पांच, दहा, वीस पैशांची नाणी कधीच गेली. आता पंचवीस पैशाचे नाणे पण दिसत नाही. पैशांची किंमत वाढली पण मोल कमी झाले. यंत्राची किमत (मजूरी) वाढली. श्रमाची किंमत व मोल, दोनही कमी झाली. मजूराला तासाच्या पण हिशेबाने कोणी मजूरी देत नाही. शारीरिक व मानसिक श्रम कमी करायला यंत्र वापरायचे. पण जे यंत्राचे गुलाम झाले त्यांचे मोल काय? (अधिक वाचा: सोन्याच्या शोधात: मुंबईत आपला परिसर )
 
(२) छायाचित्रे :  "मुंबईत सोने शोधणारे" | रेमीजीयस डिसोजा
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.


Page copy protected against web site content infringement by Copyscape

June 16, 2010

जीजुत्सू प्रतिकार-विद्या


बलिष्टांचे शक्तीस्थान त्यांचे मर्मस्थान पण असते. कुस्तीवरच्या एका कथेत फारा वर्षापूर्वी वाचलेले वाक्य. गुरू आपल्या शिष्याला हा उपदेश देतो. मल्लयुध्दाच्या डावपेचांतील हे एक इंगितः आपल्यापेक्षा अधिक ताकदीच्या मल्लाला चीतपट करायचे असल्यास त्याचे वर्म ओळखणे जरूरीचे असते. 

भारतातून सुमारे इ. स. 200 वर्षापूर्वी बौध्ध भिक्षू चीनमध्ये धर्मप्रचारासाठी हिमालयातून जात असत. वाटेत लुटारू हल्ले करीत. तेव्हा त्या निशस्त्र भिक्षूनी जीजूत्सू  विद्येचा शोध लावला. ही खरीखुरी विधायक सर्जनशीलता.  


आज याची भारतातील बहुसंख्य दीनदलीत, पिडीत, कृषिक वर्गाला गरज आहे, विद्येची गरज आहे, नक्षलवाद्यांची नाही, परजीवी संघटनांची नाही. भारतातील उच्चवर्गीयानी, किंवा उच्चवर्णीयानी म्हणा, त्याना हजारो वर्षे विद्येपासून वंचित ठेवले, व या निधर्मी लोकशाहीत अजूनही ठेवलेय. ही विद्या बदलत्या
काळानुसार बदलायला हवी. ही विद्या कृषिक भारतीयांसाठी समर्पक आहे.

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

June 07, 2010

धरतीची लेकुरे पोरकी

 पाऊस कुठुनी आला कुणी नाही देखिला. 
वसुंधरेचे झरे आहेत लपलेले. 
कुणी नाही बोले मनी जपलेल्या आशा.   
कुणा ना आठवली स्वप्ने. 
धरतीची लेकुरे पोरकी तिच्या उबेला पारखी 
शोधिती निवारा अंधकारी.  


~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.


Page copy protected against web site content infringement by Copyscape